महत्वाच्या बातम्या

 अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नुकसान ग्रस्त धानपिकांची नुकसान भरपाई द्यावी


- आमदार डॉक्टर देवराव होळी यांना शेतकऱ्यांचे निवेदन

- नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शासन स्तरावरून मदत मिळवून देणार आमदार डॉक्टर देवराव होळी यांचे निवेदकांना आश्वासन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यामध्ये जुलै ते ऑगस्ट दरम्यानच्या अतिवृष्टी व महापुराच्या परिस्थितीमुळे असंख्य शेतकऱ्यांचे धानाचे पीक उध्वस्त झाले. परंतु त्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या काहीं निकषांमुळे पूरबुळीच्या मदतीपासून वंचित राहावे लागले त्यामुळे या मदतीपासून वंचित राहिलेल्या व जुलै ते ऑगस्ट या महिन्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाच्या माध्यमातून आमदार डॉक्टर देवराव होळी यांच्याकडे केली आहे. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती आनंदजी भांडेकर, तालुक्याचे अध्यक्ष दिलीप चलाख, महामंत्री साईनाथ बुरांडे, नारायण भाकरे घनश्याम भाकरे लुमाजी मशाखेत्री,काशिनाथ राऊत ,कविता म्हशाखेत्री ,ललिता पोटे , अजय कोनोजवार ,मंदाबाई कोनोजवार ,वनिता व्‍याहाडकर ,लालाजी राऊत, हरी भाकरे, सखाराम भाकरे, सुरेखा, जानकीराम राऊत, उमाकांत म्हशाखेत्री, कृष्णा बावणे, रामदास कासेवार, पांडुरंग राऊत, लुमाजी राऊत, यांचे सह स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या निवेदनावर तातडीने कार्यवाही व्हावी यासाठी आपण शासन स्तरावर तातडीनं प्रयत्न करू व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन स्तरावरून मदत मिळवून देऊ असे आश्वासन त्यांनी यावेळी निवेदकांना दिले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos