स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत मेगा इव्हेंट
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय नवी दिल्ली व क्षेत्रीय संचालक रा.से.यो.क्षेत्रीय कार्यालय, पुणे यांच्या आदेशानुसार आज विद्यापीठ परिसरात स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत मेगा इव्हेंट घेण्यात आला.
राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. श्याम खंडारे ,कार्यक्रम अधिकारी प्रमोद जावरे,सहकार्यक्रम अधिकारी वैभव मसराम उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. श्याम खंडारे म्हणाले, दैनंदिन वापरात प्लास्टिक पिशव्यांना आपल्याला हद्दपार करायचे आहे. या पिशव्यांचं विघटन होण्यासाठी ४०० ते ५०० वर्षांचा कालावधी लागतो, म्हणजे आज आपण प्लास्टिकची पिशवी वापरून टाकून दिली तर आपल्या पुढच्या चार ते पाच पिढ्यांना या प्लास्टिकचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे प्लास्टिकचा वापर आपल्याला टाळायचा आहे. असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी गोळा करण्यात आलेला प्लास्टिकचा कचरा नगर परिषदेकडे देण्यात आला. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Gadchiroli