महाराष्ट्रात तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांची भरती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वुत्तसंस्था / मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्रात लवकरच तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांची पदभरती होणार आहे. महसूल विभागाच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली असून, याबाबतचा आदेश जारी केला आहे. राज्यात तलाठ्यांच्या ३११० पदांसाठी, तर मंडळ अधिकाऱ्यांच्या ५११ पदांसाठी भरती होणार आहे. डिसेंबर अखेर किंवा जानेवारी महिन्यात या भरती बाबतची जाहिरात निघण्याची शक्यता असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात तलाठी भरती झालेली नाही. ठाकरे सरकारने तलाठी भरतीची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर राज्यात सत्तांतर झाल्याने हा विषय मागे पडला होता. आता पुन्हा तलाठी भरतीचा आदेश जारी करण्यात आला आहे. एम.पी.एस.सी मार्फत तलाठ्यांच्या ३११० जागांसाठी, तसेच मंडळ अधिकाऱ्यांच्या ५११ जागांसाठी ही भरती होणार आहे. त्यामुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.
News - Rajy