नागपूर : जिल्ह्यात मनाई आदेश लागू
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : जिल्हयात ग्रामीण भागात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रितेश महाजन यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या पोट कलम ३७ (१) अन्वये मनाई आदेश लागू केले आहेत.
नागपूर जिल्ह्यात ग्रामीण कार्यक्षेत्रात पाच किंवा अधिक व्यक्तींची सभा किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश २५ एप्रिल ते ९ मे २०२४ पर्यंत अंमलात राहणार आहे. कर्तव्यावर असलेल्या लोकसेवकांना, विवाह किंवा अत्यंयात्रा आणि धार्मिक कार्यक्रमांना हा आदेश लागू होणार नाही.
News - Nagpur