तरुणांनो संशोधनाच्या कार्यातून रोजगार देणारे बना : केंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिंह
- एमगीरीला सदिच्छा भेट
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : देशातील तरुणांमध्ये संशोधन करण्याची मोठी ताकद आहे. तरुणांनी संशोधनात्मक कार्य करुन रोजगार निर्मिती करावी व इतरांना रोजगार देण्याचे कार्य करावे, असे केंद्रीय ग्रामीण विकास तथा पंचायतराज राज्यमंत्री गिरीराज सिंह यांनी आज एमगीरी येथे अधिका-यांना मार्गदर्शन करतांना केले.
यावेळी खा. रामदास तडस, केंद्र शासनाचे ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त सचिव हुकुमसिंह मिना, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, एमगीरीचे संचालक डॉ. आशुतोष मुरकुटे आदी उपस्थित होते.
प्रत्येक तरुणामध्ये रोजगार मिळविण्याची किंवा सरकारी नोकरी मिळविण्याची मानसिकता असते. या मानसिकतेतून बाहेर पडावे व नवसंशोधन विकसित करुन इतरांना रोजगार देण्याचे कार्य करावे. महात्मा गांधींनी आत्मनिर्भय भारताचे स्वप्न पाहले होते. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याची आपल्या देशातील वैज्ञानिक ताकत बनत आहे. नवयुवक ही आपली शक्ती आहे. पुर्वी लोकांना स्टार्टअप माहित नव्हते, आता नव नवीन संकल्पना तरुण वैज्ञानिक राबवित आहे. यामुळे ज्ञान व विज्ञानासोबत देश पुढे जात असल्याचे गिरीराज सिंह म्हणाले.
ग्रामीण हातकारागिरांना उद्योगांशी जोडण्यासाठी खादी उद्योग महामंडळाच्या माध्यमातून एमगिरीने प्रक्षिशित केल्यास लघु उद्योगांना चालना मिळेल. केसांपासुन अमिनो अँसिडसारखे प्रकल्प स्वयंसहायता बचत गटाच्या माध्यमातुन सुरु करावे. यामुळे गरीब महिलांच्या हाताला काम मिळून त्यांची आर्थिक उन्नती साधेल, असेही गिरीराज सिंह म्हणाले. व्हॅक्सीन बनविण्यात जगात भारत देश पहिल्या क्रमांकावर आहे. याचे श्रेय देशातील संशोधकाला जातात. अशाच प्रकारचे संशोधनाचे कार्य एमगीरीनी करावे, असे आवाहन यावेळी गीरीराज सिंह यांनी केले.
यावेळी खा. तडस यांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले.
तत्पूर्वी गिरीराज सिंह यांनी एमगीरी मार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांची व संशोधनाची माहिती जाणून घेतली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फनसे, तहसिलदार रमेश कोळपे व एमगीरी येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
News - Wardha