आम आदमी पक्षातर्फे महिला मेळावा व विद्यार्थ्यांचा सत्कारासह स्वराज्य संवाद संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / बल्लारपूर : दिल्ली - पंजाब मध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर व गोवा- गुजरात विधानसभेत प्रवेश करून राष्ट्रीय पक्ष म्हणून उदयास आलेल्या आम आदमी पक्षाने आता महाराष्ट्राकडे नजर वळवली आहे. नुकतेच झालेल्या पंढरपूर ते रायगड स्वराज्य यात्रा नंतर आता पक्षाने स्वराज्य संवाद सभा सुरू केला आहे. बल्लारपूर शहरात सुध्दा जनतेच्या प्रचंड प्रतिसादासह शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांच्या नेतृत्वात स्वराज्य संवाद सभा शहरातील पेपर मील काटा गेट चौकात १५ जून रोजी संपन्न झाला. या स्वराज्य संवाद कार्यक्रमांतर्गत महिला मेळावा तसेच 10 वी व 12 वी परिक्षेत प्रविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून माजी विदर्भ संयोजक डॉ. देवेंद्र वानखडे, डॉ. केशव बानते, जिल्हा संघटनमंत्री प्रा.नागेश्वर गंडलेवार आणि भिवराज सोनी, जिल्हा सचिव संतोष दोरखंडे, सुनिता पाटील, संजना मूलचंदानी, स्नेहा भाटिया, डॉ. सपना इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
या स्वराज्य संवाद कार्यक्रमांत पाहुण्यांनी शिवरायांच्या स्वराज्याची कल्पना वास्तवात उतरविण्यासाठी जी धडपड आम आदमी पक्ष करत आहे, त्याची माहिती जनतेला दिली. कार्यक्रमाला पक्षाच्या कार्यकर्त्यांसह सामान्य जनतेचा प्रचंड असा प्रतिसाद पहावयास मिळाला.
News - Chandrapur