महत्वाच्या बातम्या

 बुद्धांचे तत्त्व अंगिकारा तेव्हाच प्रगती शक्य : आ. कृष्णा गजबे यांचे प्रतिपादन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / देसाईगंज : संपूर्ण जगात स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेच्या युगात स्वत:चे सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी मानव नैतिक मूल्यांना पायदळी तुडविताना दिसत आहे. बुद्धांचा धम्म वैर भावना नष्ट करतो. मानवाला जीवन जगताना शांती अहिंसा, करुणा व मैत्री या तत्त्वांची जोड असल्यास तो प्रगती करू शकतो. याकरिता जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी बुद्ध तत्त्वज्ञान अंगीकारले पाहिजे, असे प्रतिपादन आ. कृष्णा गजबे यांनी केले. देसाईगंज  येथील जेतवन बुद्ध विहारात वर्षावास समारोप व ग्रंथालयाचे उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला भदंत करुणा बुद्धज्योती, भदंत लोकसंघ, बौद्ध समाज कोअर कमिटीचे विजय बन्सोड, बाळकृष्ण बांबोळकर, इंजि. नरेश मेश्राम, डाकराम वाघमारे, राजरतन मेश्राम, हंसराज लांडगे, प्रकाश सांगोळे, भीमराव नगराळे, माजी नगरसेवक हरीष मोटवानी, छगन सेडमाके, सहायक पोलीस उपनिरीक्षक अशोक नंदेश्वर उपस्थित होते. यावेळी आमदार कृष्णा गजबे म्हणाले, संपूर्ण जगात सत्ता हस्तगत करण्यासाठी मानव नैतिक मूल्यांना पायदळी तुडविताना दिसत आहे. युद्धातून कोणत्याच समस्येचे निराकरण होऊ शकत नाही, असे प्रतिपादन करीत जेतवन बुद्धविहार बांधकामाकरिता १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही आ. गजबे यांनी दिली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कुमार मेंढे, देवराव धोंगडे,प्रीतम जनबंधू, सागर बन्सोड यांच्यासह सदस्यांनी सहकार्य केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos