पंतप्रधान नरेद्र मोदींच्या आर्थिक धोरणांमुळे भारतावर मंदीचा परिणाम नाही
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : जगातील आर्थिक संकटाच्या काळात अनेक देशाचे भारताच्या आर्थिक प्रगतीकडे लक्ष आहे. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्येही भारताच्या कामगिरीचा डंका वाजला आहे.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये केंद्रीय रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारताने गुंतवणुकीवर आधारित वाढीवर लक्ष केंद्रित केल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना महासाथीच्या काळात पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
"यामुळेच भारत महासाथीतून योग्यरित्या बाहेर येऊ शकला आणि भारताने ६ टक्क्यांची वाढ नोंदवले. जेव्हा कोरोनाची महासाथ आली तेव्हा यामुळे आर्थिक आणि मानवी संकट निर्माण झाले. तेव्हा मोठ्या देशांनी प्रोत्साहन पॅकेजची घोषणा करण्यास सुरूवात केले. यामुळे महागाईचा दबाव वाढला," असे अश्विनी वैष्णव म्हणाले. २०२२ मध्ये डिजिटल पेमेंट ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून १ लाख २१ हजार ७५३ अब्ज रुपयांची देवाणघेवाण झाले. हे अमेरिका, ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्सच्या एकूण ट्रान्झॅक्शनच्या ४ टक्के असल्याचेही ते म्हणाले.
केंद्रीय दूरसंचार मंत्री पुढे म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावतीने जगात इंडिया स्टॅकचा अवलंब करावा, असा संदेश आणले आहे. उद्योन्मुख देशांपासून ते उद्योन्मुख कंपन्यांसाठी हा एक उत्तम डिजिटल उपाय आहे. एवढेच नाही तर हे ओपन सोर्स प्लॅटफॉर्मवर आधारित आहे, याचा अर्थ कोणीही त्याचा फायदा घेऊ शकतो."
अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वे मंत्रालयाचाही कार्यभार आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधील दुसर्या सत्रात, त्यांनी देशातील वेगाने विकसित होत असलेल्या सेमीकंडक्टर इकोसिस्टमबद्दल देखील माहिती दिले. "येत्या ३ वर्षांत भारत दूरसंचार उपकरणांचा मोठा निर्यातदार असेल. हा देशातील एक मोठा उद्योग आहे. सुमारे ८७ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे. अगदी Apple iPhone १४ भारतात बनवला जात आहे आणि सप्लाय चीन बदलत आहे," असंही त्यांनी सांगितले.
News - Rajy