नियमांचे पालन न केल्यामुळे रिझर्व्ह बँकेने १३ बँकांना ठोठावला दंड
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील १३ कोर्पोरेटिव बँकांना दंड ठोठावला आहे. आरबीआयने सोमवारी म्हणाले की, हा दंड नियमांचे पालन न केल्यामुळे ठोठावण्यात आललेला आहे. आरबीआयने या बँकांवर ५० हजार रुपयांपासून ४ लाखांपर्यंत दंडात्मक कारवाई केले आहे.
रिझर्व्ह बँकेने श्री कन्यका नागरी सहकारी बँक, चंद्रपूर यांना सर्वाधिक ४ लाख रुपये आणि वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, बीड यांना २.५० लाख रुपये दंड ठोठावला आहे. यानंतर वाई अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, सातारा आणि इंदूर प्रीमियर को-ऑपरेटिव्ह बँक, इंदूर यांना २ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
नागरी सहकारी बँक, पाटण आणि द तुरा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, मेघालय यांना वेगवेगळ्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल प्रत्येकी १.५० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय अन्य काही बँकांनाही दंड ठोठावण्यात आलेला आहे.
नागरीक सहकारी बँक मर्यादीत जगदलपूर, जिजाऊ व्यावसायिक सहकारी बँक अमरावती, ईस्टर्न आणि नॉर्थ-ईस्ट फ्रंटियर रेल्वे को-ऑप बँक कोलकाता, जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक लिमिटेड छतरपूर, नागरीक सहकारी बँक मर्यादीत रायगड, जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक लिमिटेड बिलासपूर आणि जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक लिमिटेड शहडोल या सहकारी बँकांका समावेश आहे.
News - Rajy