खरिप हंगामात धान उत्पादक बळीराजा बोनसच्या प्रतीक्षेत
- शेतकऱ्यांमध्ये संभ्रम : शासनाला विसर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / सिंदेवाही : खरिप हंगामात शेतकऱ्यांनी विविध नैसर्गिक आपत्तींचा सामना करीत धानाचे उत्पादन घेतले आहे. मात्र, शासनाकडून अजूनही धानाला बोनस जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे यावर्षी धानाला बोनस जाहीर होणार की नाही? याबाबत शेतकरी संभ्रमात आहेत.
सिंदेवाही तालुक्यात एकही मोठा प्रकल्प नाही व सिंचन सुविधा नाहीत. त्यामुळे बहुसंख्य शेतकरी खरिपात धानपिकाचे उत्पादन घेतल्यानंतर या पिकावर वर्षभराची गुजरान करीत असतात. शहरातील शेतकऱ्यांना काही ना काही रोजगार मिळत असतो. परंतु, गाव खेड्यात राहणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीवरच अवलंबून राहावे लागते.शासनाकडून धानपिकाला हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. मात्र,बोनसची घोषणा केलेली नाही.शेतकरी संकटांचा सामना करीत धानपिकाच्या मळणीच्या कामाला सुरुवात केली आहे. काही शेतकऱ्यांनी तर आपल्या धानाची विक्रीही केली आहे. मात्र, शासनाकडून अजूनही धानपिकाचे बोनस जाहीर करण्यात आले नाही. त्यामुळे यावर्षी धानाला बोनस जाहीर होणार की नाही, याबाबत शेतकरी संभ्रमात आहेत. दरम्यान, काही दिवसांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या अधिवेशनातून तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
यावर्षी हंगामाच्या सुरुवातीलाच निसर्गाने दगा दिल्यामुळे शेतकऱ्यांना पऱ्यांची पेरणी, रोवणीची करावे लागले.कामे कशीबशी आटोपावी लागली. यानंतर धानपीक अंतीम टप्यात असतांना म्हणजे, पिकाच्या कापणी व बांधणीच्या वेळी परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे विविध नैसर्गिक आपत्तींचा सामना करीत धानाचे उत्पादन घेतले आहे. मात्र, शासनाकडून अजूनही धानाला बोनस जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे यावर्षी धानाला बोनस जाहीर होणार की नाही, याबाबत शेतकरी संभ्रमात सापडले आहेत तरी शासनाने शेतकरी यांचा अंत न पाहता लवकर बोनस जाहिर करुन दिलासा द्यावा .हि तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे.
News - Chandrapur