विजेच्या तारेच्या संपर्कात आल्याने बसने घेतला पेट : २५ हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील गाजीपूर येथे एका प्रवासी बसने अचानक पेट घेतल्याने या बसमधील २५ हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याचे समजते. अद्याप हा आकडा अधिकृतरित्या समोर आलेला नाही. या बसमध्ये ३० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते.
हे सर्व प्रवासी एका लग्नसोहळ्यावरून परतत होते. या बसमध्ये ३८ हून अधिक प्रवासी होते. ही बस गाजीपूर मरदह पोलीस ठाणे क्षेत्रातून जात असताना बसवर विजेची तार कोसळली. त्यामुळे बसने झटक्यात पेट घेतला व एक स्फोट झाल्याचे समजते.
News - World