महत्वाच्या बातम्या

 वारकऱ्यावरील लाठीचार्ज च्या निषेधार्थ चंद्रपूर शहर महिला काँग्रेस च्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांच्या निर्देश्यानुसार संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दिंडीतील वारकऱ्यांवर आळंदी येथे पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला. वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच ही अतिशय निंदनीय घटना घडली असून महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेचा सर्वोच्च सोहळा असणाऱ्या आषाढी वारीला गालबोट लागले आहे. ही महाराष्ट्रामध्ये काळीमा फासणारी घटना शिंदे - फडणवीस सरकारच्या चुकीमुळे आणि गैरव्यवस्थापणामुळे घडली आहेत. या कृत्याचा चंद्रपूर शहर (जिल्हा )महिला काँग्रेस कमिटी च्या अध्यक्षा सौ. चंदा वैरागडे यांचे नेतृत्वात निषेध करून घटनेची चौकशी करून वारकऱ्यांना संरक्षण देण्याच्या मागणीचे निवेदन विनय गौडा जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना देण्यात आले. 

यावेळी माजी महापौर सौ. संगीता अमृतकर माजी नगरसेविका विना खणके, सकिना अन्सारी, शालिनी भगत उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos