महत्वाच्या बातम्या

 धान खरेदी केंद्र सुरु करून धानाला बोनस जाहीर करा : शेतकऱ्यांची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : तालुक्यात  धानाचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. धान पिकाची लागवड केलेले पिक कसेबसे हाती येताच खर्चाची परतफेड करण्यासाठी धान विकणे हे गरजेचे असते. मात्र शासन स्तरावरून आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु झाले नसल्याने शेतकऱ्यांपुढे विक्रीचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे धान खरेदी केंद्राची सुरु होण्याची वाट बळीराजा बघत आहे. त्यामळे धान खरेदी केंद्र सुरु करावे अशी मागणी शेतकऱ्यामध्ये होत आहे.

धान पिकाची लागवड केल्यानंतर ३ ते ४ महीण्यात धान पिक पूर्णत्वात येते. हलक्या धानाचे पिक हे शेतकऱ्यांच्या हाती आले आहे. तर इतर वाणाच्या धानाचे पिक होत असून शेतकऱ्यांची धान कापणीसह मळणी ही केली जात आहे. धान उत्पादकांनी त्यांच्याकडे असलेली सर्व जमापुंजी चांगले पीकपाणी घेण्यासाठी खर्च केलेली आहे.

शेतीच्या भरोवशावर असलेल्या शेतकऱ्यांना कुटुंबाच्या उर्दरनिर्वाहासोबत शेती खर्चासाठी लागलेली देवाण घेवाणासाठी पैशाची अंत्यत आवश्यकता भासत असते. त्यामुळे शेतकऱ्यांना महागाईमुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागण्याची पाळी आहे .

शासनाचा हमीभाव २०४० रुपये आहे. यात उत्पन्नानुसार शेतात लागलेला खर्च सुद्धा निघत नसल्याने शेती व्यवसाय पूर्णतः तोट्यात जात आहे. सतत चारपाच वर्षापासून शेतकरी जनतेला हा नुकसानीचा फटका सहन करावा लागतो आहे. तरी पण दरवर्षाला शेतकरी हा आपला परंपरागत व्यवसाय सुरू ठेवत आहेत. एक नवी आशा घेवून या वर्षाला तरी आपल्याला काहीतरी शेतातुन फायदा मिळेल. या उदात्त हेतूने पण नशीबी मात्रा  निराशाच पदरी पडत आहे. दरवर्षाला शेती पीक घेण्यासाठी लागणार आर्थिक कर्जाचा बोझा वाढतच आहे. फायदा होईल आणि उसणवार बँकेचे कर्ज वापस करता येईल. ही अपेक्षा शेतकरी जनतेची पूर्ण होत नाही. कारण हया एवढया कमी प्रमाणात होणाऱ्या उत्पन्नात परीवाराचा खर्च कसा हाकायचा हाच मोठा गभीर प्रश्न समोर ठाकला आहे. आपला देश कृषीप्रधान असून शेतकरी राजा आज संकटात सापडला आहे. तरी शासनाने हया सर्व बाबीचा व शेतकरी जनतेचा विचार करुन बोनस जाहिर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos