महत्वाच्या बातम्या

 मतदात्यांनो चला, मतदानाचा हक्क बजावूया


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

समृध्द लोकशाहीमध्ये मतदानाचे महत्व लक्षात घेवून प्रत्येक मतदाराने मतदान करणे अत्यावश्यक आहे. याशिवाय लोकशाही सशक्त व मजबूत होऊ शकणार नाही. समाजातील प्रत्येक घटकाने जागरुक व्यक्ती, संस्थांनी मतदानाचे प्रमाण 100 टक्के पूर्णपणे वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. मतदान जनजागृतीसाठी स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम सुरु करण्यात आलेले आहेत. आपला मताधिकार बजावणे हे आपले कर्तव्य आहे.

प्रत्येक मतदार यांनी मी मतदानापासून वंचीत राहणार नाही याची प्रतिज्ञा घ्यावी. 2019 च्या 08 वर्धा लोकसभा मतदार संघाच्या संसदीय सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ही सरासरी 53 टक्के एवढी होती. अर्थात 47 टक्के लोकांनी मतदान केले नाही. याची कारणे वेगवेगळी असू शकतात. परंतु 100 टक्के लोकांचे भविष्य मात्र 53 टक्के झालेल्या मतदानावर ठरविले गेले ? याची कारण मिमांसा होणे आवश्यक आहे. जो पात्र मतदार मागील लोकसभा निवडणुकीत मतदानापासून वंचित होता किंवा त्यांनी मतदान केले नाही. त्या मतदारांनी सर्व कामे बाजूला सारुन येत्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत दिनांक 26 एप्रिल 2024 ला मतदान करायला गेले पाहिजे.

08 वर्धा लोकसभा मतदार संघाच्या संसदीय सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता शासन स्तरावरुन अनेक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. भारतीय नागरिक म्हणून संविधानाने घालून दिलेल्या निती-नियमांचे पालन करण्याची पूर्ण जबाबदारी माझी आहे. जात, धर्म, वंश, समाज, भाषा, यांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही देश विघातक वस्तूच्या, व्यक्तीच्या प्रलोभनास बळी न पडता मतदारांनी मतदानाचा हक्क निःपक्षपाती बजावलाच पाहिजे. प्रथम आणि शेवट मी भारतीय आहे हा विचार नित्य स्मरणीय समृध्द ठेवून देश विकासासाठी व लोकांच्या वैज्ञानिक व सर्वागिंण प्रगती करीता जागृक मतदार नागरिक म्हणून प्रत्येकाने आपल्या देशासाठी कर्तव्यदक्ष असावयास पाहिजे.

एका स्वंतत्र संविधानिक राष्ट्राचे नागरिक असणे हे आपले भाग्य आहे. ज्यांच्या कष्टामुळे हे भाग्य आपल्या नशिबी आहे. त्या सर्व ज्ञात अज्ञात, महात्मे व स्वातंत्र सैनिकाचे कृतज्ञतेने स्मरण करणे हे आपले कर्तव्य ठरते. सकारात्मक आचार विचारांच्या नवनवीन पुष्पांनी, स्वातंत्र्याची ही फूलबाग अधिक खुलवणे, बहरवणे ही आपल्या सर्वाची जबाबदारी आहे.

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या मतानुसार विकसित देशाचे नागरिक व्हायला आपण पात्र आहोत. असा विश्वासच मुळात आजच्या तरुणाच्या ठायी निर्माण व्हायला हवा. तोच जर झाला नाही तर देशाचे जबाबदार आणि संमजस नागरिक कसे काय होणार ?

निवडणूक कामकाजाकरीता कर्तव्यावर असणाऱ्या निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदान करण्यासाठी मिळणाऱ्या टपाली मतदानाची टक्केवारी सुध्दा 100 टक्के होताना दिसत नाही. तेव्हा अशा सर्व जागरुक मतदारांनी संविधानाने आपल्याला मुलभूत अधिकार दिलेले आहे. आपण त्याचा पुरेपूर वापर करतो का ? याचा गांभीर्याने विचार करावा व मतदानास प्रवृत्त व्हावे. जागरुक नागरिक मी भारताचा, हक्क बजाविण मतदानाचा सुदृढ व बळकट लोकशाही करिता पात्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे.

मतदान करायला जायचं आहे,

आपले कर्तव्य बजावयाचे आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos