लोककवी रमेश रामटेके यांनी प्रबोधनपर गित सादर केले. कवी खुशाल साव यांनी देखील गिते सादर केली.नाने प्रदर्शन विश्वास देशभ्रतार व निलकंठ पाटील यांचे होते. संचालन महेंद्र सोरते यांनी केले. प्रास्ताविक एम.टी. साव यांनी तर आभार अरुण बहादे यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोद ताकसांडे, प्रभाकर धाडसे, राघोबाजी सातपुते, अनिल बांगडे, आयुष बहादे, नयंती सोरते, आँचल बहादे इत्यादींनी प्रयत्न केलेत.

" />

लोककवी रमेश रामटेके यांनी प्रबोधनपर गित सादर केले. कवी खुशाल साव यांनी देखील गिते सादर केली.नाने प्रदर्शन विश्वास देशभ्रतार व निलकंठ पाटील यांचे होते. संचालन महेंद्र सोरते यांनी केले. प्रास्ताविक एम.टी. साव यांनी तर आभार अरुण बहादे यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोद ताकसांडे, प्रभाकर धाडसे, राघोबाजी सातपुते, अनिल बांगडे, आयुष बहादे, नयंती सोरते, आँचल बहादे इत्यादींनी प्रयत्न केलेत.

"/>
महत्वाच्या बातम्या

 भारतीय संविधानाच्या मुळ गाभ्यावरच आघात : प्रा.जावेद पाशा.


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : वर्तमानातील सरकारने सर्व महापुरुषांच्या विचारांचा अंतर्भाव असलेले भारतीय संविधानाचे स्वरूप बदलले आहे. लोकांच्या अधिकारांचे संरक्षण आणि कल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाची हमी लोकशाहीच्या मार्गाने भारतीय संविधानाने दिली आहे. परंतु खाऊजाच्या परिणाम कारक धडक अंमलबजावणीने लोकांचे अधिकार संकुचित झाले. त्यामुळे आज घडीला ८० करोड लोक सरकारच्या पांच किलो दयेवर जगण्याची पाळी आली.

सुशिक्षितांची बेरोजगारी कहर केला तर शेतकरी देशोधडीला लागला. मागिल ७३ वर्षात आम्हाला बोटांची ताकद समजु दिली नाही. त्यामुळे मुद्यांवर मतदान करण्याची भूमिका लोकांना घेता आली नाही आणि मतदान म्हणजेच लोकशाही असा अर्थ कायम झाला. मतदान च्या नावाखाली मताधिकार विसरून गेले त्यामुळे भारतीय संविधानाच्या मुळ गाभ्यावरच सरकार आघात करीत आहे. अशा स्थितीत आम्हाला भारतीय संविधानाचे जतन करण्यासाठी मताधिकार काराचा योग्य वापराची गरज आहे.

देशातील तमाम मागासवर्गीय व अल्पसंख्याकांचे अधिकारांचे संरक्षणासाठी आम्ही जागृत झाले पाहिजे कसे परखड मत प्रा.जावेद पाशा नागपूर यांनी व्यक्त केले. ते विसापूर येथील छञपती शिवाजी महाराज चौकातील मूलनिवासी सभ्यता संघाचे वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्य वक्ता म्हणून बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी धनंजय झाकर्डे, माजी राष्ट्रीय अध्यक्ष मूलनिवासी संघ, सोलापूर होते.  प्रा.रमेश पिसे, राज्य उपाध्यक्ष ओबीसी जनमोर्चा नागपूर यांनी ही विषयावर मतं मांडली. उद्घाटन संजय वानखेडे अध्यक्ष बौध्द महासभा यांनी केले. या प्रसंगी मंचावर आशिष जिवने बामसेफ, दुबई, नभा वाघमारे महीला अध्यक्ष चंद्रपूर, उपसरपंच अनकेश्वर मेश्राम, मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुरुवातीला नभा वाघमारे लिखित "भारतीय संविधान" पथनाट्य सादर केले त्यात नभा वाघमारे, पुणम उमरे-वाघमारे, संदीप वाघमारे, महेंद्र खंडाले, मेश्राम, बिंबिसार बरके या कलाकारांचा समावेश होता.

लोककवी रमेश रामटेके यांनी प्रबोधनपर गित सादर केले. कवी खुशाल साव यांनी देखील गिते सादर केली.नाने प्रदर्शन विश्वास देशभ्रतार व निलकंठ पाटील यांचे होते. संचालन महेंद्र सोरते यांनी केले. प्रास्ताविक एम.टी. साव यांनी तर आभार अरुण बहादे यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोद ताकसांडे, प्रभाकर धाडसे, राघोबाजी सातपुते, अनिल बांगडे, आयुष बहादे, नयंती सोरते, आँचल बहादे इत्यादींनी प्रयत्न केलेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos