महत्वाच्या बातम्या

 अखेर आमदार देवराव होळी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांला यश


- गडचिरोली जिल्ह्यातील कृषी पंप धारकांना मिळणार सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजता पर्यंत सतत वीज पुरवठा
- आमदार देवराव होळी यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री, व वनमंत्री यांचे आभार मानले
- शेतकऱ्यांनी केले आमदार देवराव होळी यांचे अभिनंदन
- मागील काही दिवसांपासून आमदार देवराव होळी यांनी केला होता सातत्याने पाठपुरावा
विदर्भ न्युज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : असामाजिक तत्त्वांचा तसेच हिंस्त्र रानटी पशुंचा प्रभाव असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील कृषी पंपांची लोड शेडिंग बंद करावी. अशी मागणी आमदार देवराव होळी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने लावून धरली होती. त्यांच्या या मागणीला यश मिळाले असून आता  शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजता या कालावधीमध्ये  वीज पुरवठा देण्याचे निर्देश ऊर्जा मंत्र्यांनी संबंधितांना दिल्याने आमदार देवराव होळी यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे.
याबद्दल आमदार देवराव होळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सिंचनाच्या पुरेशा सोयी नसल्याने येथील शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावर व त्यानंतर कृषी पंपावर अवलंबून राहावे लागते. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी राज्यात पुन्हा लोडशेडिंग सुरू केले. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी रात्री अपरात्री शेतामध्ये जावे लागत असे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचा रानटी हिंस्त्र पशुंच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला. ही बाब आमदार देवराव होळी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली व लोडशेडिंग बंद करून दिवसा वीज पुरवठा सुरू करावा अशी मागणी लावून धरली. त्यांच्या या मागणीला आता यश मिळाले असून आता शेतकऱ्यांना सकाळी ६ ते सायंकाळी ६ या दरम्यान वीज पुरवठा मिळणार आहे. त्यांच्या या प्रयत्नांबद्दल जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आमदार देवराव होळी यांचे अभिनंदन केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos