हिवाळ्यात चंद्रपूरच्या प्रदूषणात वाढ : प्रदूषित दिवस वाढले मात्र धोकादायक प्रदूषणात घट
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपुर चे प्रदूषित दिवस वाढले आहे तसेच प्रदूषणात घट होत असताना दिसत आहे.
चंद्रपुर चा हवा गुणवत्ता निर्देशांक ऑक्टोबर २०२३ चे प्रदूषण ३१ पैकी ३१ दिवस प्रदूषण; चांगले दिवस - ००, समाधानकारक प्रदूषण -१४, साधारण प्रदूषण -१७, जास्त प्रदुषित - ००, अति प्रदूषित- ००, धोकादायक प्रदूषण- ००.
३१ दिवसा पैकी ३१ दिवस प्रदूषण आढळले तरी ह्या दिवसात धोकादायक किंवा अति प्रदूषनाची नोंद नाही ही समाधान कारक बाब आहे.
२०२२ चे ऑक्टोबर चे प्रदूषण- ३१ पैकी २३ दिवस प्रदूषण; चांगले दिवस - ०८, समाधानकारक प्रदूषण -१३, साधारण प्रदूषण ०८, जास्त प्रदुषित दिवस - ०२, अति प्रदूषित दिवस- ००, धोकादायक दिवस- ००.
मागील वर्षात ३१ पैकी २३ दिवस प्रदूषण आढळले असले तरी ०२ दिवस वगळता अति किंवा धोकादायक प्रदूषण आढळले नाही.
प्रदूषनाची कारणे :
वाहनांची वाढती संख्या, त्यातून निघणारा धूर, रस्त्यावरील धूळ, कचरा ज्वलन, बांधकाम आणि थर्मल पॉवर स्टेशन, कोळसा खाणी, इतर उद्योग इत्यादी अनेक कारणांमुळे अलीकडे अनेक जिल्ह्यात प्रदूषनात मोठी वाढ झाली असून त्यातून आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. मागील काही वर्षांत प्रदूषणात अग्रेसर असलेल्या चंद्रपुर चे प्रदूषण काही प्रमाणात कमी झाले होते ते पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
विदर्भात प्रत्येक शहरात अलीकडे विकासासाठी विविध बांधकाम, रस्ते बांधणे सुरू असते त्यातच वाहनाच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर धूळ आणि धूर बाहेर पडते. जिल्ह्यासहित शहरात सुद्धा अश्याच समस्या निर्माण होत असल्याने प्रदूषणात सतत वाढ होत असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारी वरून लक्षात येते.
हवा गुणवत्ता निर्देशांक काढण्यासाठी धूलिकण, २.५,१०. ओझोन, कार्बन मोनोकसाईड, सल्फर डाय ओकसाईड, नायट्रोजन डाय ओकसाईड, ह्या प्रदूषकांना मिळून निर्देशांक काढला जातो. .० - ५० निर्देशांक चांगला मानल्या जातो. परंतु ५१-१०० निर्देशांक समाधान कारक/प्रदूषित मानला जातो. १०० -२०० साधारण प्रदूषित, २००-३०० जास्त प्रदूषित, ३००-४०० अति प्रदुषित तर ४००-५०० निर्देशांक धोकादायक मानला जातो.
प्रदूषणामुळे रोगराईत वाढ :
हिवाळ्यात दरवर्षी प्रदूषण वाढते. थंडी मुळे आणि संथ वाऱ्या मुळे प्रदूषके वाहून न जाता एकाच ठिकाणी जमिनीवर स्थिर होतात. पूर्वी हिवाळा आरोग्यासाठी चागला मानला जात असे परंतु अलीकडे प्रदूषणामुळे तो धोकादायक ठरत आहे. प्रदूषणामुळे आधिच श्वसनाच्या रोग् असणाऱ्या ना हानिकारक असते, तसेच नव्याने श्वसनाचे रोग वाढू शकतात. दमा, ब्रॉकाय टिस, टीबी, हृदय रोग आणि मानसिक रोग वाढतात.
प्रदूषण नियंत्रण कसे होणार :
चंद्रपुर जिल्ह्यात आणि शहरात सर्वाधिक प्रदूषण हे कोळसा खाणी आणि थर्मल पॉवर स्टेशन चे असले तरी ह्यासाठी नागरिक सुद्धा तितकेच जिम्मेदार आहेत. वाढती वाहने, धुळीचे रस्ते, कचरा ज्वलन, कोळसा ज्वलन आणि शहरातील व्यावसाईक प्रतिष्ठाण कारणीभूत असतात.
हे प्रदूषण नियंत्रण ठेवण्यासाठी वृक्षसंख्येत वाढ करणे, शहरात सायकल चा उपयोग वाढविणे, वाहनांच्या संख्येत घट करणे, कचरा न इळणे, उदयोगांणी प्रदूषण रोखणे, नागरिकांनी सुद्धा प्रदूषण होऊ नये अश्या उपाययोजना करणे, प्रशासनाणे कडक अनेक उपाय योजना राबविण्यात आल्या तरच प्रदूषनावर नियंत्रण होऊ शकेल असे प्रा. सुरेश चोपणे पर्यावरण अभ्यासक यांनी म्हंटले आहे.
News - Chandrapur