महत्वाच्या बातम्या

  शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीची प्रक्रिया पुर्ण करावी : २५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : केंद्रशासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत शासनामार्फत आदिवासी विकास महामंडळ धानाची खरेदी करीत असते. यासाठी शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातील पिकाची ई-पीक प्रक्रिया पुर्ण करणे अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांनी धान पिकाची लागवड केली, त्या सर्व शेतकऱ्यांची ई-पीक प्रक्रिया नोंदणी करणे आवश्यक आहे. जर ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर धान विक्रीला अडचण निर्माण होऊ शकते. त्यासाठी जिल्हयातील शेतकऱ्यांनी त्वरीत ई-पीक पाहणीची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक एन.झेड. येरमे यांनी केले आहे.

शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी प्रक्रियेसोबतच धान विक्रीसाठी ज्या बँक खात्याची व्यवहारासाठी निवड केली  जाते, त्या बँक खात्यासोबत आधार जोडणी करावी. व सदर बँक खाते अद्ययावत ठेवावे. तसेच सदर बँक खाते जनधन योजनेत समाविष्ट नसल्याची खात्री पुर्ण करून घ्यावी. संयुक्त असल्यास खातेदार क्रमांक १ चे आधार जोडणी करून घ्यावी किंवा स्वतंत्र खाते सुरू करावे. या सर्व प्रक्रिया शेतकरी नोंदणी सुरू होण्यापुर्वी पूर्ण कराव्यात. जेणेकरून, शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्यास शक्य होईल.

ई-पीक पाहणी करण्याची अंतिम २५ सप्टेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी प्रक्रिया लवकर पूर्ण करून केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे महामंडळामार्फत कळविण्यात आले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos