महत्वाच्या बातम्या

 उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी पुरस्कार स्पर्धा 


- जिल्हास्तरीय समिती गठीत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना पुरस्कार देण्यात येणार आहेृत. यासाठी जिल्हास्तरीय समीतीचे गठण करण्यात आले. यामध्ये उपजिल्हाधिकारी पुनर्वसन अंजली मरोड अध्यक्ष असून सदस्य सचिव जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुध्द राजुरकर आहेत. उत्कृष्ट मंडळांची निवड करून पुरस्कार दिले जाणार आहे.

राज्यातील पहिल्या तीन विजेत्या क्रमांकांना अनुक्रमे पाच लाख, अडीच लाख व एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. राज्यातील पहिल्या विजेत्यांबरोबरच राज्य समितीकडे जिल्हास्तरीय समितीने निवड केलेल्या ११ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी वरील प्रमाणे तीन विजेत्या गणेशोत्सव मंडळांना वगळून उर्वरित ४१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास राज्य शासनाकडून प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येईल. या पुरस्कारासाठीच्या २४ लाख ६० हजार रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

पुरस्कारांसाठी निवड होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी विविध निकष असतील. निकषाप्रमाणे त्यांना गुण दिले जातील. या स्पर्धेत धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर १० जुलै ते ५ सप्टेंबर या कालावधीत नोंदणी करणे आवश्यक आहे.

विजेत्यांच्या निवडीसाठी गठीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरावरील समितीमध्ये उपजिल्हाधिकारी पुनवर्सन अंजली मरोड अध्यक्ष असून जिल्हा नियोजन अधिकारी अनिरूध्द राजुरकर हे समितीचे सदस्य सचिव आहे. तर महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापिठाचे कला प्राद्यापक डॉ. सतिश पावडे, महाराष्ट प्रदुषण नियंत्रण मंडळ नागपूरचे क्षेत्र अधिकारी मनोज वाटाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश पराडकर, प्रभारी पोलीस उपअधिक्षक मनोज वाडीवे यांची सदस्य म्हणुन निवड करण्यात आली आहे. 

निवड समिती प्रत्यक्ष उत्सवस्थळी भेट देतील तसेच मंडळाकडून व्हीडीओग्राफी व कागदपत्र जमा करुन घेतील. जिल्हास्तरीय समितीकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन करण्यात येईल. सदर समिती मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या ४ जिल्ह्यातून प्रत्येकी 3व अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी १ उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची शिफारस करुन त्यांची नावे सर्व कागदपत्र व्हीडीओसह राज्य समितीकडे सादर करेल. याबाबतचा सविस्तर शासन निर्णय  ४ जुलै रोजी निर्गमीत करण्यात आला आहे, असल्याचे समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा नियोजन अधिकारी यांनी कळविले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos