महत्वाच्या बातम्या

 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीवर भर द्यावा : मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे


- खरीप हंगामपूर्व मेळावा उत्साहात साजरा

- शेतकऱ्यांनी विविध तज्ञांचे मार्गदर्शन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : शेतकऱ्यांनी फळबाग क्षेत्र वाढविण्यावर भर द्यावा. फळबाग लागवडीसाठी सिंचन विहिरी, शेततळे व धडक सिंचन योजनेच्या माध्यमातून सिंचन सुविधा उपलब्ध करून दिली जाते. भाजीपाला व फळपिके घेतल्यास ग्रेडिंग व पॅकिंग करून जिल्ह्याबाहेर सुद्धा विकता येतात. येणाऱ्या खरीप हंगामाची तयारी करीत असताना बिबिएफ तंत्रज्ञानाचा वापर करून पेरणी करावी, असे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले.  

कृषि विज्ञान केंद्रराष्ट्रीय बागवानी बोर्ड आणि एवोनिथ पुरस्कृत व बायफ इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल लाइव्हलीहुड्स अँड डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत खरीप हंगामपूर्व शेतकरी मेळाव्याचे आयोजन विकास भवन येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी घुगे यांच्यासह राष्ट्रीय बागवानी बोर्ड, नागपूरचे उपनिदेशक सतीशकुमार शर्मा, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कतोरे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रभाकर शिवणकर, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक सुशांत पाटील, जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक चेतन शिरभाते, स्मार्ट प्रकल्पाचे गुलाबराव भदाणे, कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. नागनाथ जंगवाड, दिपक तपासे, एवोनिथ सीएसआर प्रमुख विद्या पाल उपस्थित होते.

राष्ट्रीय बागवानी बोर्डचे उपनिदेशक सतीशकुमार शर्मा यांनी फळबागेविषयी विविध योजना, पॉलीहाऊस उभारणीचा खर्च व त्यासंबंधी शेतकऱ्यांसाठी विविध योजना याबद्दल माहिती दिली. या योजनांबाबत शेतकऱ्यांनी एनएचबीच्या www.nhb.gov.in या वेबसाईट वरून माहिती घ्यावी असे आवाहन केले. प्रास्ताविक डॉ. जीवन कतोरे यांनी केले. मान्सूनच्या आगमनाची परिस्थिती बघता शेतकऱ्यांनी कोणकोणत्या उपाययोजना करायला पाहिजेत याविषयी कतोरे यांनी माहिती दिली.

प्रभाकर शिवणकर यांनी शेतकऱ्यांनी पारंपारिक पिक पद्धतीमध्ये बदल करून उपलब्ध व नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून जिल्ह्यात नवीन पिक पद्धत अवलंबण्यावर भर द्यावा, असे सांगितले. चेतन शिरभाते यांनी फळबाग लागवड, ग्रीन हाऊस, पॉलीहाऊस यासाठी कर्जसुविधा व अनुदान उपलब्ध असल्याचे सांगितले. सुशांत पाटील यांनी फळबागेमध्ये यांत्रिकीकरणाचा व त्यावर प्रक्रिया करण्याचा उद्योग उभारावा, यासाठी जवळपास २५ ते ३५ टक्के अनुदान मिळते याबद्दल माहिती दिली. एवोनिथच्या विद्या पाल यांनी एवोनिथ व बायफ यांनी एवोनिथच्या कार्याबद्दल माहिती दिली.

स्मार्ट प्रकल्पाचे गुलाबराव भदाणे यांनी स्मार्ट प्रकल्पांतर्गत विविध उपक्रमांची याविषयी माहिती दिली. प्राचार्य डॉ. नागनाथ जंगवाड यांनी कृषि शिक्षणाच्या संधी व प्रवेश प्रक्रिया, मनोज भवरे यांनी नरेगा योजनेंतर्गत विविध प्रकल्प, डॉ. रुपेश झाडोदे यांनी खरीप हंगामपूर्व तयारी व प्रमुख खरीप पिक व्यवस्थापन, डॉ. निलेश वजिरे यांनी बिजप्रक्रिया व प्रमुख खरीप पिकांचे कीड व रोग व्यवस्थापण, डॉ. सचिन मुळे यांनी पावसाळ्यात पाळीव जनावरांची घ्यावयाची काळजी, डॉ. प्रेरणा धुमाळ यांनी आहारात पौष्टिक तृणधान्याचे महत्व, गजानन म्हसाळ यांनी माती परिक्षण अहवालानुसार खरीप हंगामातील पिकांचे खत व्यवस्थापण याबद्दल माहिती दिली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सचिन मुळे यांनी केले.





  Print






News - Wardha




Related Photos