अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची तात्काळ मदत करा : मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
शहर प्रतिनिधी / देसाईगंज : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची तात्काळ मदत देण्यात यावी. याकरिता मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा मका, धान व भाजीपाला या उन्हाळी पिकांची लागवड करण्यात आली होती. परंतु अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे केलेल्या कष्टाचे तोंडी आलेले घास अवकाळी पावसामुळे हिरावण्यात आले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याने तात्काळ मदत करण्यात यावी, अशी मागणी प्रितम धोंडणे तालुका अध्यक्ष रयत शेतकरी संघटना यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
News - Gadchiroli