महत्वाच्या बातम्या

 6 महिन्याच्या बालकांना मिळणार गोवरची लस : केंद्र सरकारचा मोटा निर्णय


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई : महाराष्ट्रात गोवर साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. लहान मुलांनाही मोठ्या प्रमाणात या आजाराची लागण होताना दिसतोय. यामध्ये मुंबईनंतर ठाण्यातील भिवंडीमध्ये गोवर, रुबेला आजाराने कहर केला आहे.
गोवरच्या साथीचे गांभीर्य लक्षात घेता केंद्र सरकारने यासंदर्भात एक बैठक बोलवाली. यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी माहिती दिली की, या बैठकीत एक बालक दुसऱ्यांच्या संपर्कात येतात का? ज्या ठिकाणी लसीकरण झाले नसेल तिथे ते करणे गरजेचं आहे. बालकांना लस देण्याचे काम सुरू आहे. 6 महिन्याच्या बालकांना लस देता येईल याचा विचार सुरू आहे. यावर एक्सपर्ट कमिटी अभ्यास करतेय. ही समितीच याबाबत निर्णय देईल. शिवाय याबाबत जागरूकता होणं गरजेचे आहे.
डॉ. भारती पवार पुढे म्हणाल्या, गोवरसंदर्भात अनेक ठिकाणी लसीकरण झालेले नाही. त्यामुळे सध्या हे वाढवने गरजेचे आहे. 84 टक्के लसीकरण काही ठिकाणी झाले आहे. काही राज्यात 60 टक्के लसीकरण झाले आहे.

मुंबईमध्ये गोवरचं थैमान

दरम्यान काल मुंबईत गोवरमुळे आणखी एका मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. नालासोपारा येथील एक वर्षीय मुलाचा आज उपचारा दरम्यान मुंबईत मृत्यू झालाय. त्यामुळे आता मुंबईत गोवरमुळे मृत बालकांची संख्या पोहचली 11 वर पोहोचली आहे. अशातच आता मुंबईत सध्या गोवर रूग्णांची संख्या  220 वर पोहचली आहे.
गोवरची बाधा होण्यात सर्वाधिक प्रमाण लहान बालकांचे आहे. त्यात आता 6 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बालकांनाही गोवरची लागण होत आहे.





  Print






News - Rajy




Related Photos