महत्वाच्या बातम्या

 स्वामी सत्यभक्त यांचे विचार नव्या पिढित रुजवणे गरजेचे : खासदार रामदास तडस


- ५३ वा सर्वधर्म सत्यसमाज सोहळा संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : देशाला स्वातंत्र मिळवून देण्यात ज्यांची भुमिका महत्वपुर्ण राहिली असे अनेक विरपुत्र या वर्धा नगरीने देशासाठी अर्पण केले, राष्ट्रपिता महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, जमनालाल बजाज यांच्या सोबत कार्य करणारे व्यक्तीमत्व स्वामी सत्यभक्त यांच्या नावाचा प्रकर्षाने उल्लेख करणे गरजेचे आहे. एखाद्या व्यक्तीबाबत अमरत्वाची भावना सन्या अर्थाने रुळ होणे ही त्या व्यक्तीच्या कार्याची आणि विचारांची एक शाश्वत सिध्दता 1. असते, स्वामी सत्यभक्त हे वर्धेत या पावन भुमीला लाभलेले असे एक ऋषितुल्य व्यक्तीमत्व होते ज्यांचे कार्य आणि विचार आजही नव्या पिढिला मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरणारे आहे. समाज घडविण्याची केवळ विधायक कार्यकर्तृत्वाची भावना रुचवणे गरजेचे आहे किंबहुना त्याआगोदर तसा एक विचार समाज मनावर बिंबवणे आवश्यक ठरते असे प्रतिपादन वर्धेचे खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.

आज बोरगांव (मेघे) वर्धा येथील सत्याश्रवर हॉल येथे ५३ वे सर्वधर्मीय सत्यसमाज सोहळ्या प्रसंगी कायक्रमाचे उद्घाटक म्हणुन बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंजाब हरियाणा उच्च न्यायलयाचे माजी न्यायमुर्ती जस्टीस अरुण चौधरी, गोंदिया जिल्हाचे पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष इमरानराही, अमोलकचंद जैन, सुश्री निर्मल गर्ग, राजेंद्र पुरोहित, सरपंच संतोष सेलुकर, माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज सायंकार, साध्वी सत्यमित्रा, ओमप्रकाश गुप्ता, विजय सत्यम प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. सामाजिक स्वास्थासाठी केवळ कायदा व सुव्यवस्था अस्तित्वात असुन चालत नाही तर पिढ्यानपिढ्या निरपेक्ष निर्मळ भावनेने समाजाला आचार विचारांची दिशा देणारे व्यक्ती त्या समाजाचे आधारस्तंभ ठरतात असेच भरीव सत्कार्य स्वामी सत्यभक्त यांचे आहे असे मत जस्टीस अरुण चौधरी यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी निखिल पिंगळे, डॉ. निर्मल गर्ग, इमरान राही यांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले.पाहुण्यांच्या हस्ते शांतप्रसाद सत्यदास, साधु सत्यप्रज्ञ, पुष्पा लोढा, गौरीशंकर गर्ग, अमोलकचंद जैन, राजेन्द्र पुरोहित, ज्येष्ठ समाजसेवी मोहनबाबु अग्रवाल, कॅप्टन मोहन गुजरकर, प्रबोधनकार तुकाराम घोडे, महाराज व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मोहन मोहिते यांचा स्वामी सत्यभक्त जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. निर्मल गर्ग, संचालन प्रिती सत्यम तर आभार विजय सत्यम यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मंगेश भोंगाडे, प्रकाश खंडार, राजु लभाणे, हरिष तांदळे, इंद्रपाल जोगे, सुरेश नाथानी, हरिदास पोटदुखे, अनुराग मिसाळ, सुदर्शन बढ़े, सुमीत मुनोत, सागर फोडेकर, रवि कोरडे यांनी अथक परिश्रम घेतले.





  Print






News - Wardha




Related Photos