महत्वाच्या बातम्या

 गडचिरोलीतील भयंकर घटना : संजू सरकारच्या फाशीच्या शिक्षेवर उच्च न्यायालयात सुनावणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील कांचनपूर (ता. मुलचेरा) येथील एक धक्कादायक घटनेत महिलेवर बलात्कार आणि तिच्या तीन वर्षांच्या चिमुकल्याची हत्या करणारा संजू विश्वनाथ सरकार याच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रकरण दाखल केले आहे.

घटना १९ जून २०१७ रोजी मध्यरात्री घडली, जेव्हा संजूने पीडित महिलेच्या घरात शिरून तिच्यावर बळजबरी करायला सुरुवात केली. महिलेने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी तिचा मुलगा झोपेतून जागा होऊन रडायला लागला. संजूने त्याला नाक व तोंड दाबून ठार मारले, त्यानंतर महिलेचा गळा चाकूने चिरून पळून गेला.

सकाळी महिलेची स्थिती पाहून शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी घरात प्रवेश केला. घरात महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली होती आणि तिचा मुलगा मृतावस्थेत खाटेवर होता. महिलेला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि शुद्धीवर आल्यानंतर तिने संजूच्या कृत्याचा थरारक खुलासा केला.

संजूला दिली फाशीची शिक्षा -
२४ डिसेंबर २०२५ रोजी अहेरी सत्र न्यायालयाने संजूला हत्येच्या गुन्ह्यासाठी फाशी, बलात्कार आणि हत्येचा प्रयत्न करण्यासाठी जन्मठेप, तसेच घरफोडीच्या गुन्ह्यात १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

संजूने या शिक्षेला आव्हान दिले असून, त्याच्या वतीने अ‍ॅड. राजेंद्र डागा तर राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. संजय डोईफोडे यांनी कामकाज पाहिले आहे. या प्रकरणाची अंतिम सुनावणी २४ फेब्रुवारी २०२६ रोजी उच्च न्यायालयात होणार आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos