महत्वाच्या बातम्या

 साखरपुड्याच्या जेवणातून नागरिकांना विषबाधा : अचलपूर तालुक्यातील जीवनपुरा येथील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था अमरावती : साखरपुड्याच्या जेवणातून तब्बल दीडशे लोकांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील जीवनपुरा गावात हा प्रकार घडला आहे.
जीवनपुरा येथील रहिवासी असलेले प्रहाराचे पदाधिकारी, माजी नगरसेवक अनिल पिंपळे यांच्या मुलीचा साखरपुडा होता. या कार्यक्रमात जेवलेल्या लोकांना अन्नातून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. जेवणानंतर जवळपास शंभर ते दीडशे नागरिकांना मळमळ, उलट्या आणि हगवणचा त्रास सुरू झाला. त्यानंतर या सर्व नागरिकांना उपचारासाठी अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उपजिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान घटनेबाबत अधिक माहिती अशी की, अचलपूरच्या जीवनपुरा येथील रहिवासी अनिल पिंपळे यांच्या मुलीच्या साखरपुड्याचा कार्यक्रम होता. अनिल पिंपळे हे माजी नगरसेवक आहेत, तसेच ते प्रहारचे पदाधिकारी देखील आहेत. त्यामुळे या साखरपुड्याला नागरिकांनी गर्दी केली होती. कार्यक्रम आटोपल्यानंतर नागरिकांनी जेवण केले.
मात्र थोड्याचवेळात त्यांना मळमळ, उलट्या आणि संडासचा त्रास सुरू झाला. जवळपास शंभर ते दीडशे नागरिकांना अन्नातून विषबाधा झाली आहे. यातील काही जणांना अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर काही जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.





  Print






News - Rajy




Related Photos