महत्वाच्या बातम्या

 मुंबईत गोवरचा उद्रेक : आतापर्यंत १० बालकांचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : 
राज्यात गोवर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या चिंतेत वाढ झाली आहे. मुंबईत गोवरमुळे 10 बालकांचा मृत्यू झाला आहे. तर - मुंबई पाठोपाठ नाशिक शहरात देखील गोवरचे 4 संशयित रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे आता राज्य सरकार अॅक्शन मोडवर आलं आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आज मंत्रालयात यासंदर्भात एक महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे मुंबईत गोवरच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होतेय. गोवंडी इथे एका सव्वा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे.
त्यामुळे गोवरच्या संशयित मृतांची संख्या 10 झाली आहे. यातील एक मृत्यू मुंबईबाहेरील भिवंडी इथला आहे. गोवंडी येथे एका सव्वा वर्षांच्या मुलीला ३ नोव्हेंबरला ताप आणि खोकला सुरू झाला. 5 नोव्हेंबरला तिच्या अंगावर पुरळ दिसू लागले.
११ नोव्हेंबरला तिची प्रकृती अधिकच बिघडल्याने अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. मुंबईच्या गोवंडी विभागात सर्वाधिक ६ रुग्ण आढळले आहेत.





  Print






News - Rajy




Related Photos