लाभार्थ्यांनी ३१ मार्चपूर्वी बँक खाते आधारकार्डाशी संलग्न करा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : राज्यात विशेष सहाय्य योजनेंतर्गत राज्यपुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या वैयक्तीक लाभाच्या योजना राबविण्यात येतात. या योजनेच्या सर्व लाभार्थ्यांनी आपल्या बँकेशी संपर्क साधून आपले बँक खाते ३१ मार्च २०२४ पूर्वी आधार कार्डशी संलग्न करावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांनी केले.
जे लाभार्थी आधार कार्ड संलग्नीकरण करणार नाहीत, त्या लाभार्थ्यांना १ एप्रिल २०२४ पासून निधी वितरीत करण्यात येणार नाही, याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
News - Nagpur