साखरेच्या निर्यात अनुदानाप्रमाणे कापसाच्या निर्यातीला अनुदान देण्यात यावे
- खासदार रामदास तडस यांनी नियम ३७७ अंतर्गत उपस्थित केला मुद्दा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (वर्धा) : यावर्षी विदर्भात अतीवृष्टीमुळे मोठया प्रमाणात शेतीचे नुकसान झालेले आहे, त्यामुळे विदर्भातील शेतकरी संकटात आहे, या मध्ये सर्वात जास्त नुकसान कापुस पिकाचे झालेले आहे, तसेच कापसाचे भाव सुध्दा दिवसेदिवस कमी होत आहे, अनेक कापूस उत्पादक शेतकरी आणि निर्यातदार कापुसाच्या निर्यातीवर प्रोत्साहन अनुदान देण्याची विनंती खासदार रामदास तडस यांना केली होती, त्या अनुषंगाने आज खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत नियम ३७७ अंतर्गत कापसाचा विषय उपस्थित करुन लोकसभेचे लक्ष वेधले.
विदर्भातील वर्धा, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, नागपूर, वाशीम आणि बुलढाणा जिल्ह्यात कापसाची लागवड सर्वाधिक आहे आणि मुळात सर्व शेतकरी केवळ कापसावरच अवलंबून आहेत, कापूस उत्पादक आणि निर्यातदारांची मागणी आहे की, ज्या प्रकारे सरकार दरवर्षी साखरेच्या निर्यातीवर अनुदान देते, त्याचप्रमाणे कापसाच्या निर्यातीलाही अनुदान देण्याची गरज आहे, कारण कधी-कधी कापसाला खूप कमी भाव मिळतो. परदेशात भारतातील कापूस निर्यातदार आणि उत्पादकांना मोठा तोटा सहन करावा लागतो. यंदा अमेरिकेत कापसावर मोठी मंदी आहे, त्यामुळे भारतातील कापूस निर्यातदारांना मोठा तोटा सहन करावा लागू शकतो, त्यामुळे जोपर्यंत ते दरवर्षी किमान ५० ते ६० लाख गाठींची निर्यात करण्याची व्यवस्था करत नाहीत, तोपर्यंत कापूस उत्पादक आणि निर्यातदारांचे नुकसान भरून काढता येत नाही. याकरिता कापूस उत्पादक आणि निर्यातदारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे, अशी विनंती खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत नियम ३७७ अंतर्गत वस्त्रमंत्री यांना केले.
आज विदर्भातील कपास उत्पादक शेतकरी संकटात आहे, अतिवृष्टी व कापसाला कमी भाव यामुळे कापुस उत्पादक शेतकरी तसेच निर्यातदार संकटात आहे, याकरिता ज्याप्रमाणे साखरेच्या निर्यातीवर अनुदान दिल्या जाते, त्याचप्रमाणे कापसाच्या निर्यातीसाठी प्रोत्साहन देत अनुदान योजना जाहीर करणे आवश्यक आहे. देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या धोरणाला बळ मिळावे, यासाठी केन्द्रसरकारने निर्णय घेणे आवश्यक असल्याचे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले.
News - Rajy