अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिका लाभार्थ्यांसाठी शिधावस्तुंचे वितरण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत शासनाकडून नियतन प्राप्त झालेले आहे. रास्तभाव दुकानदारांना पुरवठा करून कार्यरत पात्र शिधापत्रिकाधारकांना तातडीने वितरण करण्याचे निर्देशित करण्यात आलेले आहे.
फेब्रुवारी २०२३ मध्ये प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिका लाभार्थ्यांना प्रति व्यक्तीला १ किलो गहु, ४ किलो तांदुळ व अंत्योदय प्रति शिधापत्रिका लाभार्थ्यांना ५ किलो गहु, ३० किलो तांदूळ व १ किलो साखर शिधावस्तुचे वितरण उपलब्ध करण्यात येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांनी कळविले आहे.
News - Bhandara