महत्वाच्या बातम्या

 एक वेळ उपासी रहावे लागत असेल तर रहा परंतु शिक्षणापासून वंचित राहू नका : आ.विनोद अग्रवाल


- आ. विनोद अग्रवाल यांच्या हस्ते बनाथर येथील शाळेमध्ये वार्षिक स्नेह सम्मेलनाचे उद्घाटन संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : शिक्षणासाठी जर एक वेळ उपासी रहावे लागत असेल तर रहायला पाहिजे परंतु शिक्षणापासून वंचित राहू नका असे प्रतिपादन आ.विनोद अग्रवाल यांनी बनाथर येथील शाळेमध्ये वार्षिक स्नेह सम्मेलनाचे उद्घाटन दरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच सन्मानाचे जीवन जगायचे असेल किंवा आपल्या अधिकार करीता लढायच असेल त्यासाठी आजच्या या युगामध्ये शिक्षण महत्वाचे आहे. व इतिहास साक्षी आहे की समाजामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब, बिरसा मुंडा, शिवाजी महाराज,भगतसिंह या महापुरुषांना त्यांच्या कार्यासाठी त्यांची आम्ही जयंती, पुण्यतिथी साजरी करीत असतो कारण त्यांचे कार्य महान आहेत. व या महापुरुषांनी जे धड़े शिकवले आहे ते मोलाचे असून आज त्यांच्या दाखविलेला मार्गावर चालल्यास यशाच मार्ग मिळेल.

आपल्या जीवनाचा घ्येय जरी निश्चित असला व त्यानुसार आम्ही जर प्रयत्न केले तर आम्ही निश्चितपणे आमच्या गंतव्यस्थानावर पोहोचू तसेच पालकांनी चांगले संस्कार दिले पाहिजे.तसेच शैक्षणिक ज्ञानाअतिरिक्त सामाजिक व सांसारिक ज्ञान असणे हे अत्यंत गरजेचे आहे. तेव्हाच आम्ही सहजपणे जीवन जगु शकतो. व शालेय विद्यार्थ्याना मध्ये मोठी उत्सुकता असते की वार्षिक स्नेह सम्मेलनाचे आयोजन झाले पाहिजे व त्या माध्यमातून मंचावर विद्यार्थ्यांची कला समोर येते तसेच मंचाच्या माध्यमातून प्रतिभेला जोपण्यासाठी संधी मिळते असे वक्तव्य आ.विनोद अग्रवाल यांनी बनाथर येथील शाळेमध्ये वार्षिक स्नेह सम्मेलनाचे उद्घाटन निमित्त देऊन विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमामध्ये आ.विनोद अग्रवाल, सभापती मुनेश रहांगडाले, नेहा तुरकर जि.प सदस्या, केतन तुरकर, शिवलाल जमरे, पस.सदस्य, गुलाब नागदिवे सरपंच, फागुलाल नागफासे उपसरपंच, राजेश माने, मुख्याध्यापक फुलबांधे सर, आनंद वासनिक, संतोष कछवाह, व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येमध्ये विद्यार्थी उपस्थित होते.   





  Print






News - Gondia




Related Photos