देशात समान नागरी कायदा लागू होण्याची शक्यता : सर्वोच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने देशात समान नागरी कायदा लागण्याची शक्यता आहे.
समितीला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. देशात समान नागरी कायदा लागू होणार का? असा सवाल आता आणखी जास्त चर्चेत आहे. कारण समान नागरी कायद्याबाबत करण्यात आलेले परीक्षण योग्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. कलम 162 अंतर्गत समिती स्थापनेचा अधिकार राज्यांना असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले. परीक्षण न्यायालयाकडून मान्य झाल्याने समान नागरी कायदा लागू होण्याची शक्यता आता बळावली आहे.
News - World