महत्वाच्या बातम्या

 शिधापत्रिका धारकांना मिळणार वर्षभर मोफत अन्नधान्य


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम-२०१३ अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील पात्र लाभार्थ्यांसाठी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत अनुज्ञेय असलेले अन्नधान्य मोफत वितरित करण्‍यात येत आहे. शिधापत्रिका धारकांनी महिन्याच्या १ तारखेपासून धान्याचा लाभ घ्यावा.

माहे मार्च महिन्याचे शिधावस्तु वाटपाचे परिमाण या प्रमाणे आहेत. प्राधान्य गट प्रति व्यक्ती १ किलो गहु व ४ किलो तांदुळ तर अंत्योदय गटास प्रति शिधापत्रिका १० किलो गहु व २५ किलो तांदुळ मोफत देण्यात येणार आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी २० रुपये प्रति किलो दराप्रमाणे एक किलो साखर देण्यात येणार असल्याचे अन्नधान्य वितरण अधिकारी नागपूर यांनी कळविले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos