महत्वाच्या बातम्या

 शेतकऱ्यांना मतदानापासून वंचीत ठेवणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक रद्द करा


- कुनघाडा येथील शेतकऱ्यांचे आमदार देवराव होळी यांना निवेदन
- शिंदे व फडणवीस सरकारने १४ जुलै २०२२ च्या शासन निर्णयाप्रमाणे शेतकऱ्यांना दिला आहे मतदानाचा अधिकार
- शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देवून नव्याने निवडणूक प्रक्रिया सुरू करावी
विदर्भ न्युज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : १४ जुलै २०२२ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील शिंदे व फडणवीस सरकारने १० आर पर्यंत शेतजमीन असणाऱ्यासह सर्वच शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार बहाल केला असून त्याशिवाय सदर निवडणूक घेण्यात येत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक तात्काळ रद्द करण्यात यावी. अशी मागणी कुनघाडा येथील शेतकऱ्यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव होळी यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती आनंद भांडेकर, भाजपा तालुक्याचे नेते दिलीप चलाख, यांच्या सहकार्याने शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यात भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे शिंदे व फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार प्रदान केला. मात्र या निवडणुकीमध्ये शासन निर्णयाची अंमलबजावणी न करता शेतकऱ्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे ही निवडणूक शेतकऱ्यांवर अन्याय करणारी असून त्यांनाही मतदानाचा अधिकार असावा या दृष्टीने विचार करून सदर निवडणूक रद्द करून शेतकऱ्यांना मतदानाच्या अधिकारासह निवडणूक प्रक्रिया सुरू करावी. अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून आमदार देवराव होळी यांच्याकडे शेतकऱ्यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos