महत्वाच्या बातम्या

 जनावरांनाही उष्माघाताचा धोका, जनावरांची घ्या काळजी : पशुसंवर्धन विभागाचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : २३ एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढला. यामधून जनावरेदेखील सुटत नसल्याचे दिसून येते. उन्हामुळे जनावरांना तडक्या आजारासह उष्माघाताचाही धोका संभवत असल्याने त्यांची काळजी घेण्याचा सल्ला पशुसंवर्धन विभागाने दिला.

तसेच जिल्ह्यात मार्च महिन्यात ४१ डिग्री सेल्सिअस तापमान होते. एप्रिल महिन्यात ४२ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान गेले. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे उन्हाच्या झळा कमी झाल्याचे दिसून येते. येत्या काही दिवसांत तापमानाचा पारा आणखी वाढण्याचा अंदाज असल्याने जनावरांचे आरोग्य जपण्याचा सल्ला पशुसंवर्धन विभागाकडून दिला जात आहे.

त्यामुळे सध्या ऊन-सावलीचा खेळ सुरू असला तरी उष्णता मात्र कायम आहे. तापमान आणि उष्णतेपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी पशुपालकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी. म्हशींना डुंबण्याची सोय असल्यास पाण्यात सोडावे. पाण्याच्या हौदात तर त्यात मूळ व मीठ टाकून काठीने ढवळावे. यातून उन्हामुळे येणारा अशक्तपणा कमी होण्यास मदत होते, असा सल्ला पशुसंवर्धन विभागाने दिला आहे. प्रतिबंधात्मक उपाय गोठ्यामध्ये भरपूर खेळती हवा असावी. अधूनमधून पाणी फवारावे. छतावर पालापाचोळा, गवत टाकून त्यावर पाणी शिंपडावे. त्यामुळे मोठा परिसर बंड राहतो. म्हशीमध्ये घामग्रंथींची संख्या कमी असल्यामुळे शरीराचे तापमान कमी करण्यासाठी किंवा थंड ठेवण्यासाठी म्हशींना पाण्यात काही वेळेसाठी डुंबून ठेवणे, म्हशींचा निसर्गतः रंग काळा असून,कातडीही जाड असते. उन्हाची तीव्रता वाढली की कातडी लगेच तापते. दिवसातून तीन ते चार वेळा थंड पाणी पाजावे. आहारामध्ये वाढीव क्षार मिश्रणाचा वापर करावा. सकाळी ११ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ४ नंतर जनावरे चरण्यासाठी सोडावी. दुपारच्या उन्हात जनावरे सावलीत बांधावीत. दुपारी हिरवा मका, लसूण घास यांसारखी पोषण वैरण द्यावे.

जनावरांच्या उष्माघाताची लक्षणे काय?

जनावरे अस्वस्थ होतात तसेच जनावरांची तहान-भूक मंदावते. जनावरे कोणतीही हालचाल न करता बसून राहतात. पशूना ८ ते १० तासांनंतर अतिसार होण्याची शक्यता जाणवते . श्वासोच्छासाचा दर वाढून धाप लागल्यासारखे होते. डोळे लालसर होऊन डोळ्यांतून पाणी गळायला लागते.





  Print






News - Bhandara




Related Photos