महत्वाच्या बातम्या

 स्वामी विवेकानंद कॉलेज येथे इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : स्थानिक स्वामी विवेकानंद जुनिअर सायन्स कॉलेज येथे इयत्ता १२ वी च्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ देण्यात आला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून कॉलेजचे संस्थापक सतीश चिचघरे, आबा चीचघरे व कॉलेजच्या प्राचार्य संगीता अतकमवार या होत्या. बारावीच्या विद्यार्थ्यांना समाधान शेंडगे यांनी कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच अभ्यासाबरोबर आपले आरोग्यही जपणे फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी योग व आदर्श जीवनसरणी महत्त्वाची आहे, असे विद्यार्थ्यांना पटवून दिले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी काही मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. अकरावीच्या विद्यार्थ्यांकडून बारावीच्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आले. कार्यक्रमासाठी वर्ग ११ वी च्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले. 

कार्यक्रमाचे संचालन कु. प्राजक्ता खेडेकर तर आभार सोनाली पुराम यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos