महत्वाच्या बातम्या

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन


- १ नोव्हेंबर पासुन नवीन अर्ज स्विकारणे सुरु

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यातील कनिष्ठ, वरिष्ठ  व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेणा-या महाविद्यालयात प्रवेश मिळालेल्या आणि शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यानी नवीन अर्ज सादर करणे व नुतणीकरण करण्यासाठी १ नोव्हेंबर पासुन अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

योजनेंतर्गत अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांना भोजन, निवास व शैक्षणिक सुविधा स्वत: उपलब्ध करुन  घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येते. असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos