महत्वाच्या बातम्या

 राज्यात लवकरच तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांची भरती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वुत्तसंस्था / मुंबई : एम.पी.एस.सी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्यात लवकरच तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांची पदभरती होणार आहे. ज्यामध्ये तलाठीच्या ३ हजार ११० पदासांठी तर मंडळ अधिकाऱ्यांची ५११ पदांसाछी भरती होणार आहे. महसूल विभागाच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. राज्य शासनाने याबाबत आदेश काढला आहे. डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारी महिन्यात या भरती बाबत जाहिरात निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या तरुणांसाठी गुडन्यूज आहे. तलाठी आणि मंडळ अधिकारी या पदांसाठी जे उमेदवार इच्छूक आहेत. त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे. तलाठी हे पद ग्रामीण भागात महत्त्वाचे असते. तलाठीला देखील अनेक अधिकार असतात. राज्यात अनेक वर्षांपासून तलाठी भरती झाली नाही. त्यामुळे आता इच्छूकांसाठी ही मोठी संधी असणार आहे.





  Print






News - Rajy




Related Photos