महत्वाच्या बातम्या

 राज्यात ७७६ लाख ८७ क्विंटल साखर उत्पादन : ४ साखर कारखाने बंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई राज्यातील ऊस गाळप हंगामाची वाटचाल अंतिम टप्प्याकडे सुरू आहे. सद्य: स्थितीत ७९० लाख ६५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले असून, सरासरी ९.८३ टक्के सरासरी उताऱ्यानुसार ७७६ लाख ८७ हजार क्विंटल इतके साखरेचे उत्पादन तयार झालेले आहे.

चालू वर्षी राज्यात १०३ सहकारी व १०४ खासगी मिळून २०७ कारखान्यांकडून साखर उत्पादन सुरू होते. त्यापैकी ४ साखर कारखाने बंद झाल्याची माहिती साखर आयुक्तालयातील अधिकारी शंकर पवार यांनी दिली.

सद्य:स्थितीत राज्यात ९ लाख ४६ हजार ६५० मेट्रिक टन याप्रमाणे उसाचे रोजचे गाळप होत आहे. चालूवर्षी ऐन पावसाळी हंगामात पर्जन्यमान कमी झाल्याने उसाची किमान वाढ न झाल्याने उसाचे पर्यायाने साखरेचे अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यात कारखानदारांकडून उपलब्ध उसाच्या गाळपासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

राज्यात ऊस गाळप, साखर उत्पादन व उताऱ्यात कोल्हापूर विभागाने बाजी मारली आहे. अंतिम टप्प्यात जास्तीत जास्त ऊस गाळप करून अपेक्षित साखर उत्पादन करण्याच्या दृष्टीने ऊसतोडणीचे नियोजन करून कारखान्यांकडून गाळप सुरू आहे.

गतवर्ष २०२२-२३ च्या हंगामात १३ फेब्रुवारी अखेर २०७ कारखाने सुरू होते. त्यांनी ८६५ लाख ९६ हजार टनांइतके ऊस गाळप पूर्ण केले होते. तर ९.८३ टक्के सरासरी उताऱ्यानुसार ७७६ लाख ८७ हजार क्विंटल इतके साखर उत्पादन झाले होते. याचा तुलनात्मक विचार करता चालूवर्षी ऊस गाळप संथगतीने सुरू असून, साखर उत्पादनात घट झाले आहे.





  Print






News - Rajy




Related Photos