महत्वाच्या बातम्या

 केंद्रासरकारकडून जीएसटी पोटी १३ हजार २१५ कोटी थकीत


- महाराष्ट्राला दोन वर्षांचा परतावा मिळाला नाही

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : सरकार बदलले तरीही केंद्र सरकारकडून येणारा वस्तू व सेवा कर (जीएसटी) परतावा अद्यापही थकीत आहे. जीएसटी परताव्याचे तब्बल १३ हजार २१५ कोटी अजूनही राज्याला केंद्राकडून येणे आहे. कोरोनानंतर सावरत असलेल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी जीएसटीची रक्कम संजीवनीच ठरणार आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात केंद्राकडून जीएसटीपोटी येणाऱ्या थकबाकीची रक्कम जाहीर सभेतून सांगितले. जूनमध्ये शिंदे-फडणवीस सरकार आले. त्यावेळी सुमारे २२ हजार कोटींची जीएसटी थकबाकी येणे होते. यापैकी २०२०-२१ या आर्थिक वर्षात जीएसटी ८ हजार कोटी केंद्र सरकार आणि कॅगकडे पाठपुरावा करून मिळविण्यात आले. मात्र, अद्यापही सुमारे १३ हजार २१५ कोटी येणे बाकी आहे.      





  Print






News - Rajy




Related Photos