महत्वाच्या बातम्या

 संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमकांच्या पुनर्वसनासाठी दोन्ही सदनातील सदस्यांची समित गठीत होणार


 - वन मंत्री सुधीर मुनगंटीवार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्त संस्था / मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन क्षेत्रावर झालेल्या अतिक्रमणातील पात्र अतिक्रमकांचे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुनर्वसन केले जात आहे. त्यांच्यासाठीची घरे बांधून पूर्ण होईपर्यंत विधिमंडळाच्या दोन्ही सदनातील संबंधित सदस्यांची समिती तयार केली जाईल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य राजहंस सिंह यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री मुनगंटीवार म्हणाले की, उच्च न्यायालयाने ७ मे १९९७ च्या आदेशानुसार संजय गांधी उद्यानातील १ जानेवारी १९९५ पूर्वीच्या अतिक्रमकांचे उद्यानाबाहेर पुनर्वसन करण्याचे निर्देश दिले. पहिल्या टप्प्यात पात्र ठरलेल्या अतिक्रमकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणास देण्यात आली होती.

त्यानुसार संघर्षनगर, चांदिवली येथे ११ हजार ३८५ पात्र अतिक्रमकांचे पुनर्वसन करण्यात आले. उर्वरित पात्र अतिक्रमकांची पुनर्वसन प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करण्याच्या दृष्टीने तत्कालीन पर्यटन मंत्र्यांच्या

अध्यक्षतेखालील समितीच्या १३ जानेवारी २०२२ च्या बैठकीतील निर्देशानुसार पर्यायी क्षेत्र निश्चित करण्यासाठी सर्वसमावेशक प्रकल्प अहवाल तयार करण्याबाबत गृहनिर्माण व नगरविकास विभाग यांना कळविण्यात आले आहे. यानुसार पुढील कार्यवाही सुरू असल्याचे मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले. दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील म्हाडाची घरे पूर्ण करण्यासाठी दिरंगाई करणाऱ्या डीबी रिअल्टी या कंपनीची निविदा तपासून तात्काळ रद्द करण्याच्या सूचना व शिफारस वन विभाग झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाला देईल, असेही त्यांनी सांगितले.

या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री प्रवीण दरेकर, महादेव जानकर, राजेश राठोड यांनी सहभाग घेतला.





  Print






News - Rajy




Related Photos