बल्लारपूर शहरातील इंग्रजी माध्यम कॉन्व्हेंट शाळेंची दबंग शाही
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / बल्लारपूर : काही दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या अतिवृष्टीमुळे जील्हातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक शाळा, विद्यालय, महाविद्यालय, भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आपत्ती व्यवस्थापन २००५ च्या कलम ३०(२) (५) व (१८) नुसार प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी यांनी सर्व शाळांना २७ जुलै २०२३ रोजी सुट्टी जाहीर केली.
परंतु या निर्णयाला न मानता काही इंग्रजी माध्यमाच्या शाळा त्यातील कर्मचारी व शिक्षण यांना कुठलीही कारण नसताना शाळेत बोलून शासनाच्या नियमाला पाठ दाखविण्याचा काम त्या शाळा करीत आहे. ही बाब आताचीच नसून या आधीही असे घडत आले आहे.
शिक्षक, कर्मचारी हा आपल्या नोकरीच्या भीतीमुळे पुढे येऊन तक्रार नोंदवायला येऊ शकत नाही आहे परंतु शासनाच्या दिलेल्या नियमाचे उल्लंघन जर होत असेल तर अशा शाळांना त्याचा जाब विचारला पाहिजे व असे प्रकार घडून येत असतील तर याकरिता त्यांना बजविण्यात आले पाहिजे या साठी शिक्षक वर्ग आपल्या न्याय व हक्का साठी आपल्या व्यथा व्यक्त करीत आहे.
News - Chandrapur