बोगस बियाणे विक्री प्रकरणाची सिबीआय चौकशी करुन कार्यवाही करावी : खा. रामदास तडस
- खासदार रामदास तडस यांची केंद्रीयकृषी मंत्री यांच्याकडे लोकसभेत नियम ३७७ अंतर्गत मागणी.
- बोगस बियाणाचा प्रश्न लोकसभेत.
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नवी दिल्ली (वर्धा ) : वर्धा जिल्हयातुन उघडकीस आलेल्या बोगस बियाणे विक्री प्रकरणाची अनेक राज्यातील व्याप्ती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना न्याय व आरोपींना कठोर शासन देण्याकरिता केंद्र शासनाने या विषयाची सिबीआय चौकशी करुन कार्यवाही करावी जेणे करुन येणाऱ्या काळात शेतकऱ्या विरुध्द कोणीही असे कृत्य करणार नाही. अशी मागणी वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रामदास तडस यांनी नियम ३७७ अंतर्गत लोकसभेमध्ये केन्द्रीय कृषी मंत्री यांच्याकडे लावुन धरली.
बोगस बियाने बियाणे गंभीर प्रकरण उघडकीस आल्यानंतर शेतकऱ्यांना न्याय देण्याकरिता सदर विषय संसदेत उपस्थित करण्याचे खासदार रामदास तडस यांनी जाहीर केले होते. त्यानुसार आज २४ जुलै २०२३ रोजी हा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
वर्धा जिल्ह्यात वर्धा पोलीस आणि कृषी विभागाने कापूस बियाणांचा काळाबाजार केल्याचा मोठा खुलासा केला आहे. वर्धा जिल्ह्यातील एका गोदामावर छापा टाकण्यात आला. ज्यामध्ये २९६ पोती बनावट कापूस बियाणे जप्त करण्यात आल्याचा आरोप आहे. ज्याची बाजारभाव किंमत सुमारे १ कोटी ५५ लाख ८५ हजार ९७० रुपये पोलिसांनी जप्त केली आहे. बाहेरील राज्यातून येणाऱ्या कंपणीच्या बियाणांच्या पाकिटांमध्ये बनावट बियाण्यांचे पॅकिंग करून कापसाचे बियाणे विकल्या जात होते. महिनाभरापूर्वी सुरू झालेल्या या कारखान्यातून वर्धेसह विदर्भातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर, भंडारा आणि अन्य जिल्ह्यांतील विविध कृषी केंद्रांतून बनावट बियाणांची विक्री होत असल्याचे उघड झाले आहे. या टोळीने १४ टन बनावट बियाणे विकले आहे. या बनावट कापसाच्या बियाण्यांमुळे विदर्भात १४ हजार एकरांवर पेरणी झाल्याचा संशय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन सीबीआय (CBI) चौकशी करून दोषींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी जेणेकरून पुन्हा असा गैरकृत्य करण्याचा विचार कोणी करू नये अशी मागणी लोकसभेत नियम ३७७ अंतर्गत कृषिमंत्री यांना खासदार रामदास तडस यांनी केली.
शेतकऱ्यांचे झालेले नुकसान व शेतकऱ्यांसोबत झालेली दगाबाजी ही न सहन होण्यासारखी आहे. शेतकरी अत्यंत विश्वासाने नियोजनपुर्वक बियाणे खरेदी करीत असतो, परंतु समाजातील काही प्रवृत्ती शेतकऱ्यांना दगा देत असतील तर त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहीजे अशी प्रतिक्रीया खासदार रामदास तडस यांनी यावेळी दिली.
News - World