घोडाझरी तलावात चार जणांना जलसमाधी : सेल्फी काढणे जीवावर बेतले
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावात चार जण बुडाल्याची दुदैवी घटना झाली आहे.
माहितीनुसार दोन दिवसापासून सतत पाऊस येत असल्यामुळे तलावाला खूप पाणी आलेले आहे. वरोरा तालुक्यातील शेगाव येथील ८ युवक धबधब्याचा सौंदर्य बघण्यासाठी आले असता. सेल्फी काढण्याच्या नादात एकाच पाय घसरुन पडला. त्याच्या पाटोपाठ ३ युवक पडले. ८ पैकी ४ युवकांना जलसमाधी मिळाली. तलावाच्या बाजूला उभे राहून सेल्फी काढण्याच्या नादात ४ युवकांना जीव गमवावा लागला. मृतकांमध्ये मनीष श्रीरामे (२६), धीरज झाडें (२७), संकेत मोडक (२५), चेतन मांदाडे (१७) यांचा समावेश आहे.
घटनेची माहिती मिळतात नागभीड येथील पोलीस घटनास्थळी पोहोचून त्यांचे शोध मोहीम राबवित आहेत.
News - Chandrapur