महत्वाच्या बातम्या

 तोहोगाव : तीन मुले वर्धा नदीत बुडाले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथे ३ मुले बुडाल्याने गावात खळबळ उडाली आहे.

तोहोगाव येथील ४ मुले वर्धा नदीच्या तीरावर मासेमारी करण्यासाठी गेले होते. प्रतीक नेताजी जुनघरे (११), निर्दोष ईश्वर रंगारी (१०), सोनल सुरेश रायपुरे (९) व आरुष प्रकाश चांदेकर (११) हे वर्धा नदीच्या दिशेने पोहायला व मासे पकडण्यासाठी गेले होते. मासे पकडायचे असल्याने तिघे खोल पाण्यात उतरले, पाण्याच्या अंदाज न आल्याने त्यांचा तोल बिघडला व तिघेही नदीत बुडाले.

आरुष चांदेकर याच्या लक्ष्यात येताच तो धावत पळत मदतीसाठी गावात पोहचला असता त्यांनी सर्व बाब गावकऱ्यांना सांगितले, गावकऱ्यांनी लगेच नदीच्या दिशेने गेले असता त्यांनी सर्वत्र तिघांचा शोध घेतला मात्र त्यांचा शोध लागला नाही.

सदर प्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली, बचाव दलाला पाचारण करण्यात आले आहे. नदीचा प्रवाह जोरात असल्याने तिघांचा शोध लागलेला नाही. तिघे ही नदीत बुडाल्याची माहिती कुटुंबांना मिळाल्यावर आई-वडिलांनी एकच टाहो फोडला. 

परंतु आज सकाळी प्रतीक नेताजी जूनघरे या चिमुकल्याच मृतदेह मिळाले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos