चला जाणूया नदीला या संवाद यात्रेच्या द्वितीय फेरीचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उदघाटन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालय द्वारा नियोजित चला जाणूया नदीला हया महत्वाकांशी प्रकल्पामध्ये महाराष्ट्रातील १०८ नद्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील नाग आणि आम नदीचा समावेश आहे. त्यापैकी प्रामुख्याने उमरेड तालुक्यातील मुनिया संवर्धन राखीव क्षेत्रातील साधूखोरा जामगडमधून उगम होऊन कुही तालुक्यात अंभोराजवळ वैनगंगा नदीत संगम होणाऱ्या आम नदी पुनर्जीवनासाठी आम नदी संवाद यात्रेचे द्वितीय फेरीचे उदघाटन शुक्रवार ७ जुलैला सकाळी ८ वाजता खैरी (बुटी) आणि सकाळी ११ वाजता मकरधोकाडा, ता. उमरेड येथे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे अध्यक्षतेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सौम्या शर्मा, जिल्हा परिषद आणि उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा यांचे प्रमुख उपस्थितीत आयोजित केले आहे.
दोन्ही ठिकाणी नियोजित वेळेला शालेय विद्यार्थ्यांची शिवार फेरी, जल पुजन करून कार्यक्रम सुरु होईल. त्यानंतर मान्यवर समस्त उपस्थित स्थानिक अधिकारी, स्वायत्ता संस्थांनाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांना मार्गदर्शन करणार आहेत. सर्व निसर्ग प्रेमी, जल संवर्धक मित्रानी सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. विजय घुगे, समन्वयक, आम नदी तथा अध्यक्ष, निसर्ग विज्ञान (निविम ) नागपूर आणि डॉ. प्रवीण महाजन, आर्किटेक्ट प्रद्युमन सहस्त्रभोजनी, प्रा. अरविंद कडबे, सदस्य नदी संवाद यात्रा, चला जाणूया नदीला, हरवीर सिंग, उप वनसंरक्षक, वाडे, बुटीबोरी, बाभले उत्तर उमरेड, विजय धुर्वे, सरपंच, खैरी, गट ग्रामपंचायत, गिल्लूरकर, सरपंच मकरधोकडा, ग्रामपंचायत यांनी केले आहे.
News - Nagpur