रत्नापुर ग्रामपंचायतील बंधाऱ्याच्या ४२ पाटया चोरी : चोरावर आवर घालण्याचे पोलीसासमोर आव्हान
- रात्रीची उमा नदीवरील चोरीची घटना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथे रत्नापूर शिवणी रोडवरील उमा नदीवर रत्नापुर येथील जनतेला पाणी पुरवठा करण्यासाठी योजना कार्यान्वीत केली असुन तेथुनच गावातील लोकांना पाणी पुरवठा केल्या जातो. याच नदी काठावर पंपहाउस व इतर सामान ठेवण्यासाठी दोन रुम बांधलेल्या आहेत. या उमा नदी पात्रात शासकीय अनुदानातुन सन २००९ ते २०१० ला उन्हाळ्यात पाणी साचुन राहावे म्हणून बंधारा बांधला होता. सदर बंधाराला जानेवरी ते फरवरी मध्ये पाट्या लावून पाणी जास्त राहीले पाहीजे म्हणून अडविल्या जाते. आणि नंतर पावसाळा लागताच जुन, मध्ये पाट्या काढुन पंप हाऊसचे रुम मद्धे ठेवल्या जातात. या वर्षाला सुद्धा दरवर्षी प्रमाणे २९ जुन ला मजुर लावून बंधारा येथे लावलेल्या नदीपात्रातील सर्व ४२ पाट्या मजुराचे मार्फत काढुन असलेल्या पंप हाऊसच्या रूम मध्ये आणुन सुरक्षीत ठेवल्या. येवढ्या वर्षापासुन त्या पाट्या तीथेच ठेवल्या जात होत्या पंरतु सदर ४२ नग पूर्ण पाट्या रात्री रुमचा कुलुप तोडून चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
सकाळी ग्राम पंचायत कर्मचारी राहुल कोवे तेथे पाणी टाकी कडे गेले असता ही घटना लक्षात आली. अज्ञात चोरानी हा माल लुटलेल आहे. हया बंधारा पाणी अडवण्यासाठी लागणाऱ्या पाट्या ह्या सात फुट लांब दोन फुट रुंद व जवळपास ८० किलो वजन असलेली एक पाटी असुन अश्या ४२ पाट्या चोरल्या आहेत. एक पाटीची कीमंत जवळपास १५ ते २० हजार असुन ४२ पाट्याची अंदाजे कीमंत १० लाख रुपयाचे घरात आहे.
सदर चोरीची माहीती पोलीस विभागाला ग्राम पंचायत प्रशासनाने दिलेली असुन पोलीसा समोर चोरांना पकडुन ग्रामपंचायतचा ही मालमत्ता परत मिळवून देण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. यापूर्वी ही गावात लहान मोठ्या प्रमाणात चोरीचे प्रमाण होते. परंतु ही फार मोठी चोरीची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
News - Chandrapur