महत्वाच्या बातम्या

 महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्य जिल्हास्तरीय कृषी दिन चंद्रपुर येथे साजरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / वरोरा : १ जुलै २०२३ ला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांचे जयंती निमित्य जिल्हा परिषद चंद्रपूरच्या कन्नमवार सभागृहात जिल्हास्तरीय कृषी दिन चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकरराव तोटावार यांच्या अध्यक्षतेखाली व प्रीती हिरळकर, प्रकल्प संचालक आत्मा, जिल्हा चंद्रपूर, वीरेंद्र रजपूत कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर, चंद्रकांत ठाकरे कृषी उपसंचालक चंद्रपूर, लकेश कटरे मोहीम अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. 

याप्रसंगी वीरेंद्र रजपूत कृषी विकास अधिकारी यांनी कै. वसंतराव नाईक यांचे कृषी क्षेत्रातील योगदान व कृषी दिनाचे महत्त्व प्रस्ताविकातून प्रतिपादीत केले. प्रीती हिरळकर प्रकल्प संचालक आत्मा यांनी कृषी क्षेत्रातील महिला बचत गट, फार्मर प्रोड्युसर कंपनी, शेतकरी गट यांचे कृषी क्षेत्राच्या विकासातील महत्त्व, डायव्हर्सिटी फार्मिंग, अन्न प्रक्रिया उद्योग, कृषी क्षेत्रातील आव्हाने या विषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. 

चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकरराव तोटावार यांनी अध्यक्ष स्थानावरून उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करताना शेतकऱ्यांनी पिकाचे वेळापत्रक तयार करून उत्पादन घ्यावे, सोयाबीन पिकात अष्टसूत्रीचा वापर, कोणत्याही पिकात तंत्रज्ञान वापरताना काटेकोरपणे व तंत्रशुद्ध रीतीने वापर करून  उत्पादन खर्च कमी करावा व उत्पन्नात वाढ करावी असे आवाहन उपस्थित शेतकऱ्यांना केले. 

याप्रसंगी कृषी तज्ञ अभिजीत खटी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच जिल्ह्यातील कृषी भूषण शेतकरी सुरेश बापूराव गरमडे तालुका वरोरा व हेमंत वसंतराव शेंदरे तालुका चिमूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कृषी दिन कार्यक्रमांमध्ये विभाग व जिल्हा स्तरावर सोयाबीन, कापूस, तूर भात या पिकांच्या पीक स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या शेतकऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 

त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या उत्कृष्ट लाभार्थ्यांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. तसेच चंद्रपूर तालुक्यातील कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शेतकरी महिलांना कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत प्रमाणपत्र व शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. 

सदर कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील शेतकरी, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन गजानन हटवार जिल्हा कृषी अधिकारी विघयो तर आभार लक्ष्मीनारायण दोडके, जिल्हा कृषी अधिकारी सामान्य जि.प. चंद्रपूर यांनी मानले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी कृषी, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos