आजचे दिनविशेष
३० जून महत्वाच्या घटना
१८५९ : चार्ल्स ब्लांडिन यांनी नायगारा धबधबा एकादोरीबारून कसरत करीत पार केला.
१९३७ : जगातील पहिला तत्काळ दूरध्वनी क्रमांक ९९९ लंडनमध्ये सुरु करण्यात आला.
१९४४ : मुंबईच्या सेंट्रल सिनेमात प्रभातचा रामशास्त्री हा चित्रपट रिलीज झाला.
१९६० : काँगोला बेल्जियमपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९६५ : भारत पाकिस्तानमध्ये कच्छचा करार झाला.
१९६६ : कोकासुब्बा राव भारताचे वे सरन्यायाधीश झाले.
१९६६ : अमेरिकेची सर्वात मोठी स्त्रीवादी संस्था नॅशनल ऑरगनायझेशन फॉर वुमन ची स्थापना झाली.
१९७१ : सोयुझ-११या रशियन अंतराळयानात बिघाड होऊन तीन अवकाशवीर ठार झाले.
१९७८ : अमेरिकेच्या संविधानात २६ वा बदल संमत झाला त्यामुळे मतदानाचे वय १८ वर्षे झाले.
१९८६ : केंद्रसरकार मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात करार होऊन मिझोरामला राज्याचा दर्जा देण्याचे ठरले.
१९९७ : ब्रिटनने चीन कडून ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने घेतलेले हाँगकाँग मुदत संपल्याने ब्रिटनने हे बेट समारंभपूर्वक चीनला परत दिले.
२००२ : ब्राझीलने फुटबॉल विश्वकप जिंकला.
३० जून जन्म
१४७० : फ्रान्सचा राजा चार्ल्स-आठवा यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल १४९८)
१९१९ : हॉट एअर बलूनचे निर्माते एड यॉस्ट यांचा जन्म: (मृत्यू: २७ मे २००७)
१९२८ : कल्याणजी-आनंदजी या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू कल्याणजी वीरजी शहा यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑगस्ट २०००)
१९३४ : भारतीय रसायनशास्त्रज्ञ चिंतामणी नागेश रामचंद्र राव यांचा जन्म.
१९४३ : दिग्दर्शक आणि पटकथा लेखक सईद मिर्झा यांचा जन्म.
१९५४ : डॉमिनिकाचे पंतप्रधान पिएर चार्ल्स यांचा जन्म.
१९५९ : भारतीय-इंग्लिश उद्योगपती आणि राजकारणी संदीप वर्मा यांचा जन्म.
१९६६ : अमेरिकन मुष्टीयोद्धा माइक टायसन यांचा जन्म.
१९६९ : श्रीलंकेचा क्रिकेटपटू सनत जयसूर्या यांचा जन्म.
१९७३ : भारतीय क्रिकेट खेळाडू दोड्डा गणेश यांचा जन्म.
३० जून मृत्यू
१९१७ : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्व मिळवणारे पहिले भारतीय दादाभाई नौरोजी यांचे निधन. (जन्म: ४ सप्टेंबर १८२५)
१९१९ : नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ जॉनविल्यम स्टूट रॅले यांचे निधन.
१९९२ : साहित्यिक, वक्ते समीक्षक डॉ. वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे यांचे निधन.
१९९४ : नाटककार, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक बाळ कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: २५ सप्टेंबर १९२६)
१९९७ : शास्त्रोक्त व नाट्यसंगीत गायक राजाभाऊ साठे यांचे निधन.
१९९९ : मराठी काव्यसृष्टीतील कवी कृष्णाबळवंत तथा कृ. ब. निकुंब यांचे निधन.
२००७ : दिल्लीचे चौथे मुख्यमंत्री साहिबसिंह वर्मा यांचे निधन. ( जन्म: १५ मार्च १९४३)
News - todayspecialdays