महत्वाच्या बातम्या

 वर्धा : नशा मुक्त भारत पंधरवडा जाहिर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयाद्वारे १२ ते २६ जुन पर्यंतच्या कालावधीत नशा मुक्त भारत पंधरवडा राबविण्यात येत आहे.

भारत सरकारने अंमली पदार्थांच्या धोक्याविरुध्द लढण्यासाठी ड्रग्ज मुक्त भारतसाठी एक दृष्टीकोन, संकल्प निश्चित केला आहे. त्याचे पालन करण्यासाठी, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने १२ ते २६ जून या कालावधीत नशा मुक्त भारत पंधरवडा जाहिर केला आहे. ड्रग्जच्या दुष्परिणामाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

पंचायत समिती, दिव्यांग शाळा, अनुदानित वसतिगृह तसेच ग्रामपंचायत स्तरावर नशा मुक्त भारत पंधरवडा अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.  





  Print






News - Wardha




Related Photos