अप्पर जिल्हाधिकारी चिमूर करीता सिंदेवाही करांचा विरोध
- अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाकरीता मध्यवर्ती स्थळाची निवड कां नाही ? सिंदेवाहीकरांचा संतप्त सवाल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होणे ही अत्यंत महत्वाची बाब आहे. कारण ज्यावेळेस चंद्रपूरचे विभाजन होऊन गडचीरोली जिल्हा निर्मान झाला त्यावेळेस सुद्धा सिंदेवाही बाबत सकारात्मक अहवाल पाठवीण्यात आला होता. परंतू वैनगंगेला हद्द ठरवून विभाजण केल्यामुळे सिंदेवाही हा तालुकाच राहीला. जिल्ह्याचे विभाजण करतांना नवनिर्मीत जिल्ह्याचे ठीकाण हे जवळपास समावीष्ट क्षेत्राचे मध्य ठिकाण असावे. दळण-वळणाची साधने, रेल्वे, प्रमुखमार्ग असावेत. पूरेशी जागा असावी, विभाजण संयुक्तीक असावे व जिल्हानिर्मीती प्रक्रीया ही कायमस्वरुपी असल्यामुळे प्रशासकीय, भौगोलीक, आर्थीक व वेळेच्या बचतीच्या दृष्टीने सर्वसामान्य नागरीक शासन व प्रशासनाला परवडणारी असावी. या दृष्टीकोनातून विभाजण होणे महत्वाचे आहे. जिल्हाधिकारी यांचे पत्र क्र. २२२/२० २९ जानेवारी २०२१ नुसार मागणी केलेल्या आक्षेपास अनुसरुण सिंदेवाही तालुक्यातील हजारो नागरीकांनी सामुहीक/वैयक्तीक स्वरुपात आक्षेप ऊपविभागीय अधीकारी कार्यालय चिमुर येथे माहे फरवरी २०२१ मध्ये नोंदवीले. त्यावर आजपर्यंत कोणताही निपटारा/सुणावणी न करताच १३ जून २०२३ रोजी मंत्रीमंडळात घेतलेला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय कार्यान्वित करण्याचा निर्णय हा जणहीत विरोधी असून भावनीक व राजकिय दृष्ट्या प्रेरीत आहे.
कारण चंद्रपूर जिल्हा हा १५ तालुके मिळून बनलेला आहे. तेव्हा विभाजन म्हटले तर ८-७, ९-६ या प्रमाणात होणे न्यायोचित आहे. परंतु तसे न करता ते ११-४ या प्रमाणात करुण चुक केलेली आहे. लोकसंखेच्या बाबतीत सुद्धा २०११ च्या जनगनणने नुसार चंद्रपूर जिल्ह्याची लोकसंख्या २२,०४,३०४ आहे. ठोकळ माणाने विभाजण केल्यास मूळ जिल्हा सरस समजूण १२,०४,३०४ व नवीण जिल्ह्याची १० लाख लोकसंख्या असायला पाहीजे. अहमदनगर जिल्ह्याच्या तूलनेत.
परंतू तसे न करता चंद्रपूरच्या बाबतीत मुळ जिल्हा १६,२५,१३५ व अप्पर जिल्हा ५,७९,१६९ लोकसंख्या असे विभाजण करुन फार मोठा अन्याय केलेला आहे. सिंदेवाही करांची मागणी ही सुद्धा फार जुणीच असून यापूर्वी नकाशा, अंतर व सुविधेबाबत सविस्तर शासण, प्रशासणास कळवीले आहे. तेव्हा निवेदनासोबत जोडलेल्या नकाशाचा जिल्हा/अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय निर्मीतीच्या संबंधाणे सकारात्मक विचार करावा. अन्यथा नाईलाजास्तव संविधानीक मार्गाने लढा लढावा लागेल. असा ईशारा सिंदेवाही जिल्हा निर्मीती क्रूती समितीच्या वतीने देण्यात आला.
यावेळी प्रामुख्याने सर्वश्री मनोहर पवार, जयदेव श्रीरामे, रामटेके, भालतडक, विद्या धुळेवार, वंदना गजभीये, मेंढूळकर, हिरालाल ईंदोरकर, पंकज कंकलवार, परसराम सलामे, विलास गंडाटे, लोणबले, कोकोडे व ईतर बहुसंख्य नागरीक उपस्थीत होते.
News - Chandrapur